नवी दिल्ली : बहुजननामा ऑनलाईन – २००७ साली समझोता एक्स्प्रेस बॉम्बस्फोटाने सर्व देशात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणातील आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी न्यायव्यवस्थेवरच टिपण्णी करत निशाणा साधला आहे.
सिब्बल यांनी आपल्या ट्विटरवर ट्विट करत न्यायव्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. समझोता एक्स्प्रेस बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी असीमानंदसह ४ आरोपींची निर्दोष मुक्तता कोर्टाने केली आहे. १२ वर्षांपूर्वी झालेल्या या बाँबस्फोटप्रकरणी आरोपींचा निर्दोष निकाल लागल्याने त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
विशेष (एनआयए ) कोर्टाने हा महत्त्वाचा निर्णय दिला होता. त्यानंतर आज कपिल सिब्बल यांनी ट्विट करत २००७: समझोता एक्स्प्रेस बॉम्बस्फोटात ६८ जण ठार झाले होते. त्यावर एनआयएने ८ जणांवर आरोप ठेवले होते. आता कोर्टाच्या निकालाने या सर्व आरोपीना निर्दोष मुक्तता केली आहे. मग या ६८ जणांना कुणी मारलं ? कुणालाच माहीत नाही ? आम्हाला आमच्या फौजदारी न्याय प्रणालीचा गर्व आहे. असे कपिल सिब्बल यांनी ट्विट आहे.