बहुजननामा ऑनलाइन टीम –बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणामध्ये परखड वक्तव्यामुळे चर्चेत असलेल्या अभिनेत्री कंगणा रणौतनं मुंबईची तुलना पाक व्याप्त काश्मीरसोबत केली होती. यानंतर तिच्या या वक्तव्याचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली. मराठी कलाकारांसह सोशल मीडियावर टीकेची झोड उठली आहे. त्यानंतर कंगणानं पुन्हा एकदा ओपन चॅलेंज करत ट्विट केलं आहे.
https://twitter.com/KanganaTeam/status/1301782810261299200
कंगणाने ट्विटमध्ये म्हटले आहे की, मी मुंबईत येऊ नये अशी मला बरेच लोक धमकी देत आहेत. म्हणूनच मी येत्या आठवड्यात मुंबईत येण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई विमानतळावर उतरण्याआधी मी मुंबईत येण्याची तारीखही कळवेन. कुणाच्या बापाची हिम्मत असेल तर रोखून दाखवा, असं कंगणाने धमकी देणाऱ्यांना खडेबोल सुनावले आहेत. कंगणाने पुढे स्माईल अपलोड करत म्हटलं आहे की, 9 सप्टेंबर रोजी मी मुंबईत येईल. मुंबई विमानतळावर उतरण्याआधी वेळ सांगेन. सोशल मीडियावरुन धमक्या देणाऱ्यापैकी कुणामध्ये हिंमत असेल तर रोखून दाखवा असं ओपन चॅलेंज तिनं धमक्या देणाऱ्यांना दिलं. आहे.
सुशांतच्या मृत्यूनंतर कंगणाने केलेल्या विधानांमुळे आणि त्यानंतर मुंबईची पाक व्यक्त काश्मीरसोबत केलेली तुलना यामुळे सोशल मीडियावर आणि विवध स्तरामध्ये कंगणावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. मुंबई विरुद्ध वक्तव्य करणाऱ्या कंगणाला संपप्त ट्विट करत मराठी कलावंतांनी सुनावले आहे. तिच्या या वक्तव्यानंतर तिच्यावर चहुबाजुंनी टीकेची झोड उठली आहे.