बहुजननामा ऑनलाइन – नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरमधून एक(air filling) खळबळजनक घटना समोर आली आहे. चेष्टा मस्करीत गुदद्वारात हवा भरल्यानं (air filling)अस्वस्थ झालेल्या रोजंदारीवर काम करणाऱ्या 29 वर्षीय कामगाराचा मृत्यू झाला आहे. 9 दिवसांनंतर ही घटना उघडकीस आली आहे.
ठानापाडा तालुका त्र्यंबकेश्वर लगतच्या तळवाडे शिवारात अशोका इस्टेट डेव्हलपर प्रा लिमिटेड कंपनीचा कृषी उद्योग सुमारे दीडशे एकरावर विस्तारला गेला आहे. त्या ठिकाणी वविध फळझाडे व त्या फळांपासून पेय व खाद्य पाकिटं बनवली जातात. येथील काजू ,डाळींब, आंबे अशा प्रकारातील फळांपासून वेफर्स, चिवडा, जाम अशी उत्पादनं तयार करून विक्री केली जातात.
येथील शेतात कंत्राटी पद्धतीनं कामगार कामास येतात. त्यांना साधारण 250 रुपये रोज अशी मजुरी दिली जाते. देव डोंगरी पाड्यावरील 7-8 जणांचा ग्रुप इथं सव्वा महिन्यापासून रोजंदारीवर कामाला येतो. या सर्व अकुशल कामगारांना शेतात फांद्या वेचणं व काजूगर निवडणं, साफ करणं अशी शेतीविषयक कामं दिली जातात.
28 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास अंबादास तुटे(वय 29) याच्यासोबत इतर कामगारांनी चेष्टा मस्करी करत कॉम्प्रेसरनं गुदद्वारात हवा भरली. चेष्टा मस्करीत केलेल्या या प्रकरांनंतर काही वेळानं त्या तरुणाला त्रास होऊ लागला. इतर मजुर साथीदारांनी अंबादासला त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं. प्राथमिक तपासणी केल्यानंतर अंबादासला पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात खासगी वाहनानं हलवण्यात आलं असता सायंकाळी 5 वाजता अंबादासचा मृत्यू झाला.
मृत झालेला कामगार हा कंपनीत त्याची आई व भावासह दुपारपासून होता. व्यवस्थापक हिरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कंपनीच्या व्यवस्थापनाला या घटनेची माहिती दिली. मृताची बहिण तिथंच कामाला होती. याबाबत मृताचा भाऊ सुभाष तुटे यानं अखेर पोलिसात घटनेची माहिती दिली. मात्र घटना घडून 9 दिवस झाले तरी कुठेही वाच्यता किंवा तपास झाला नसल्याची चर्चा कामगार वर्गात आहे.