नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेश येथील झाँसी येथे खाप पंचायत मध्ये तालिबानी हुकूम थांबत नसून आता अशीच एक बाब समोर आली आहे. बुंदेलखंडमध्ये खाप पंचायतीने तुघलक हुकूम जारी केला असून त्यानंतर पोलिस आणि प्रशासकीय कामकाजात गोंधळ उडाला आहे. शूरवीरांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या झांसीमधील खाप पंचायतच्या तालिबानी फरमानामुळे जोडप्याच्या अडचणी वाढल्या असून खाप पंचायतीने या जोडप्याला गोमूत्र प्यावे आणि शेण खावे असा आदेश दिला आहे. हे प्रकरण प्रेम नगर पोलीस स्टेशन क्षेत्राशी संबंधित असून पाच वर्षांपूर्वी एका जोडप्याने कुटुंबाच्या संमतीने लग्न केले होते. तसेच दोन्ही कुटुंबातील सदस्यांनी या विवाह सोहळ्याला हजेरीही लावली होती.
लग्नाच्या पाच वर्षानंतर गावात बसलेल्या खाप पंचायतीने या जोडप्याला समुदायातून बाहेर केले. खाप पंचायतीने तुघलकी हुकूम सोडत गोमूत्र प्यायल्यानंतर व गोबर खाल्ल्यानंतर समुदायात परत घेणार असल्याचे बोलले आहे, असा आरोप या जोडप्याने केला आहे. एवढेच नव्हे तर पाच लाख रुपये दंड आकारण्याचा तुघलकीचा हुकूम देऊनही पंचायतीने अडचणी निर्माण केल्या आहेत. खाप पंचायतीच्या आदेशामुळे त्रस्त झालेल्या जोडप्याने जिल्ह्यातील डीएम आणि एसएसपी यांच्याकडे मदतीची विनंती केली आहे.
पंचायतीच्या तुगलकी फरमानीचा गांभीर्याने विचार करत डीएम शिव सहाय अवस्थी आणि एसएसपी डी. प्रदीप कुमार यांनी सीओ आणि शहर दंडाधिकारी यांना पीडित जोडप्याच्या घरी पाठवत संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली. या प्रकरणाची चौकशी सुरू असून खाप पंचायतीचा हुकूम देणाऱ्या पंचांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे डीएम शिव सहाय यांनी सांगितले. तसेच या जोडप्याला सुरक्षा देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.