बहुजननामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड स्टार कंगना रणौत (Kangana Ranaut) विरोधात प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी मानहानीचा दावा ठोकला आहे. एका रिपोर्टनुसार कंगनाच्या वक्तव्यावरून त्यांनी ही केस दाखल केली आहे. कंगनानं दावा केला होता, की अख्तर(Javed Akhtar’s ) यांनी घरी बोलवून तिला धमकावत अभिनेता हृतिक रोशनची (Hrithik Roshan) माफी मागण्यास सांगितलं होतं. यापूर्वीही कंगनाविरोधात तुमकूर कर्नाटकमध्ये एक आणि मुंबईत 2 केस दाखल झाल्या आहेत. यानंतर आता जावेद अख्तर यांनीही मानहानीचा दावा ठोकला आहे.
काय म्हणाले जावेद अख्तर ?
एका इंग्रजी वृत्तानुसार, जावेद अख्तर यांच्याशी संबंधित सूत्रांच्या हवाल्यानं समोर आलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची धमकी दिली गेली नव्हती. ते स्वभावाने खूप संवदेनशील आहेत. परंतु, हे सगळं खूप दिवसांपासून सूरू होतं. आता जावेद अख्तर यांनी कंगना विरोधात मानहानीचा दावा ठोकला आहे.
ही केस कोर्टात सुरू आहे आणि जावेद साहब मोठ्या लढाईसाठी तयार आहेत. कोर्टाबाहेर सेटलमेंट करण्याचा काही प्रश्नच येत नाही. आता कंगनाच्या अडचणी आणखी वाढणार आहे, असंही सूत्रांच्या हवाल्यानं या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे.
8 महिन्यांआधी कंगनच्या मॅनेजरनं केलं होतं ट्विट
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतची बहीण आणि मॅनेजर रंगोली चंदेल हिनं (Rangoli Chandel) दिग्गज लिरिक्स आणि स्क्रिप्ट रायटर जावेद अख्तर यांच्यावर गंभीर आरोप केला होता. जावेद अख्तर यांनी एकदा कंगनाला आपल्या घरी बोलावलं आणि हृतिकची माफी मागण्यावरून तिला धमकी दिली असं रंगोलीनं म्हटलं होतं.
'कंगनाला घरी बोलावून जावेद अख्तर यांनी धमकावलं होत', बहिण 'रंगोली'चा धक्कादायक खुलासा pic.twitter.com/lAe2K5LmQf
— TimePass (@TimePassTalks) November 3, 2020
एका ट्विटर युजरच्या ट्विटला उत्तर देताना रंगोली म्हणाली, “जावेद अख्तर यांनी कंगनाला घरी बोलावलं आणि तिला घाबरवत माफी मागण्यासाठी धमकावलं की, तिनं हृतिक रोशनची माफी मागावी. महेश भट यांनी तिच्यावर चप्पल फेकली जेव्हा तिनं आत्मघाती हल्ला करणाऱ्याची भूमिका साकारण्यास नकार दिला होता. ते पीएम मोदींना फॅसिस्ट म्हणतात. चाचाजी तुम्ही दोघं काय आहात ?” असा सवालही तिनं केला होता.