बहुजननामा ऑनलाइन : मुंबई इंडियन्सनं गेल्या वर्षी विजेतेपद मिळवलं होतं. परंतु यावर्षी मात्र एका गोष्टीमुळं मुंबईच्या संघाची डोकेदुखी वाढली आहे. या गोष्टीमुळं या आयपीएलमध्ये मुंबईच्या संघाचं नुकसान होऊ शकतं असं बोललं जात आहे.
मुंबईचा संघ सध्याच्या घडीला समतोल नसल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईच्या संघात धडाकेबाज फलंदाज आहेत. चांगले अष्टपैलू क्रिकेटपटू देखील आहेत. सोबतच 3-4 चांगले वेगवान गोलंदाजही आहेत. परंतु जी गोष्टी युएईमधील खेळपट्ट्यांसाठी महत्त्वाची असते ती नक्कीच नाही असं दिसतंय.
युएईमधील खेळपट्ट्या या फिरकी गोलंदाजीला पोषक आहेत. त्यामुळं प्रत्येक संघानंच त्यांच्या ताफ्यता नावाजलेले फिरकीपटू ठेवले आहेत. परंतु ही गोष्टी मात्र मुंबईच्या संघात दिसत नाही. कारण मुंबईच्या संघात एकही नावाजलेला फिरकीपटू दिसत नाही.
मुंबईच्या संघात असणारे कृणाल पांड्या आणि जयंत यादव हे दोघंही कामचलाऊ फिरकीपटू आहेत. जयंत यादवला स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करता आलेली नाही. कृणाल पांड्या बरेच दिवस क्रिकेटपासून दूर होता. राहुल चाहर हा संघासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. परंतु त्याच्याकडे क्रिकेटचा मोठा अनुभव नाही. त्यामुळं मुंबईच्या संघाची फिरकी गोलंदाजीची बाजू ही उजवी दिसत नाही. हाच मुंबईच्या संघासाठी सर्वात मोठा धोका असल्याचं बोललं जात आहे.
मुंबईच्या संघात चांगले वेगवान गोलंदाज आहेत. जसप्रीत बुमराह हा दुखापतीमुळं बराच काळ क्रिकेटपासून दूर होता. हार्दिक पांड्या देखील वर्षभर क्रिकेट खेळलेला नाही. मिचेल मॅक्लेघन, ट्रेंट बोल्ट, नॅथन कल्टन नाईल हे परदेशी तीन वेगवान गोलंदाज संघाचा भार सांभाळू शकतात. परंतु फक्त 4 परदेशी खेळाडू एका वेळी खेळू शकतात. त्यामुळं या तिघांपैकी एकालाचा संधी मिळेल असं दिसतंय.