नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतासह जगातील सर्व देश महामारीला तोंड देत आहेत. कोट्यवधी लोकांच्या नोकर्या गेल्या आहेत. जगातील अनेक देशात कुपोषण प्रचंड वाढले आहे. या आणि अशा अनेक अडचणी असतानाही भारतातील नागरिकांनी एक नवा रेकॉर्ड केला आहे.
भारतीयांनी यावर्षी ऑक्टोबरमध्ये 21 मिलियन (2.1 कोटी) स्मार्टफोन खरेदी केले आहेत. अशाप्रकारे भारत स्मार्टफोन बाजाराने ऑक्टोबरमध्ये 42% ची मोठी वाढ नोंदवली आहे. यापूर्वी सप्टेंबर महिन्यात 23 मिलियन (2.3 कोटी) स्मार्टफोन खरेदीचा रेकॉर्ड केला आहे. कोरोनामुळे ऑनलाइन शाळा सुरू झाल्याने शहरांसह ग्रामीण तसेच दुर्गम भागातील पालकांना सुद्धा नाईलाजाने स्मार्टफोन खरेदी करावे लागले आहेत, हेदेखील यापाठीमागील प्रमुख कारण आहे.
IDC च्या रिपोर्टनुसार, 2020 च्या तिसर्या तिमाहीपासूनच भारतात स्मार्टफोनच्या मागणीने जोर पकडण्यास सुरूवात केली होती. सप्टेंबर 2020 मध्ये विक्रमी 23 मिलियन युनिट स्मार्टफोनच्या सेलनंतर ऑक्टोबरमध्ये सुद्धा 21 मिलियन युनिट सेलसह ही विक्री सुरू होती. विक्रीतील ही वाढ ऑनलाइन प्लॅटफॉर्ममुळे झाली आहे.
आयडीसीने पुढे म्हटले, ऑक्टोबर महिन्यात झालेल्या एकुण विक्रीत 25% भागीदारी दिल्ली, मुंबई, बेंगळुरु, चेन्नई आणि कोलकाताची होती. या महानगरांनंतर जयपुर, गुडगांव, चंडीगढ, लखनऊ, भोपाळ आणि कोईंबतूर सारख्या शहरात स्मार्टफोनची विक्री सर्वात जास्त झाली.
रिपोर्टमध्ये हे सुद्धा सांगण्यात आले आहे की, ऑनलाइन माध्यमातून ऑक्टोबरच्या विक्रीत 53% ची वाढ दिसून आली. तर ऑफलाइन माध्यमातून केवळ 33% ची वाढ दिसून आली. या दरम्यान कंपनी एमआयने ऑनलाइन माध्यमातून देशातील 50 प्रमुख शहरांपैकी 34 शहरांवर कब्जा केला, तर विवोने ऑफलाइन माध्यमातून देशातील 50 प्रमुख शहरांपैकी 44 शहरांवर आपला कब्जा केला.
या दरम्यान मिडरेंज सेगमेंटच्या स्मार्टफोनच्या विक्रीत 60% ची वाढ झाली. यामध्ये शियोमी, वीवो आणि सॅमसंगची भागीदारी सर्वात जास्त होती. यांच्या विक्रीत 58 टक्केपर्यंतची वाढ दिसून आली. शियोमी ऑक्टोबरमध्ये सर्वात जास्त 5.5 मिलियन स्मार्टफ़ोन विकून पहिल्या स्थानावर होती. 4.5 मिलियनसह सॅमसंग दुसर्या, 3.9 मिलियनसह वीवो तिसर्या, 3.0 मिलियनसह रियलमी चौथ्या, तर 2.7 मिलियन स्मार्टफ़ोन विकून ओपो पाचव्या स्थानावर होती.