नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय रेल्वे आता ट्रेनचं वेळापत्रक पूर्णपणे बदलण्याच्या तयारीत आहे. नव्या वेळापत्रकानुसार रेल्वे प्रशासन आता जवळजवळ 500 ट्रेन बंद करण्याचा आणि 10 हजार थांबे बंद करण्याचा विचार करत आहे. हे नवीन वेळापत्रक कोरोना महामारी संपल्यानंतर लागू केलं जाईल, सध्या कोरोना काळाच्या आधीसारखंच वेळापत्रक सुरु राहणार आहे. एका मीडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं की, या नव्या वेळापत्रकामुळे भारतीय रेल्वेचं उत्पन्न वर्षाला 1500 कोटी रुपयांपर्यंत वाढणार आहे. रेल्वे मंत्रालयाच्या माहितीनुसार 1500 कोटींचं हे उत्पन्न चार्ज मध्ये वाढ केल्यामुळे मिळणार आहे. हे वेळापत्रक अन्य ऑपरेशनल पॉलिसीमध्ये बदल करून लागू केलं जाईल.
इंडियन एक्सप्रेसने आपल्या एका न्यूज रिपोर्टमध्ये सांगितलं की 15% अधिक माल ट्रेनच्या एक्सक्लूसिव्ह कॉरिडॉरमध्ये अधिक स्पीडमध्ये चालवता येऊ शकेल. रेल्वेने अंदाज वर्तवला आहे की संपूर्ण नेटवर्क स्पीडमध्ये सर्व्हिस ट्रेनच्या सरासरी वेगात 10% ची बचत होणार आहे. इंडियन रेल्वेने आयआयटी बॉम्बेच्या वैज्ञानिकांसोबत मिळून झिरो बेस्ड टाइम टेबल तयार केला आहे.
काय असणार नव्या वेळापत्रकात विशेष
– सरासरी वर्षाला 50% पेक्षा कमी ओक्युपेसी असणाऱ्या रेल्वेला या नेटवर्क मध्ये कोणतंही स्थान मिळणार नाही. जर गरज वाटली तर या रेल्वेला अन्य रेल्वेमध्ये मर्ज केलं जाईल.
– लांब पल्ल्याच्या रेल्वेला 200 किलोमीटरच्या आत थांबा असणार नाही. जर त्या दरम्यान कोणतं महत्वाचं शहर असेल तर त्या ठिकाणी थांबा असू शकतो. रेल्वे एकूण 10 हजार थांबे काढून टाकणार आहे.
– सर्व पॅसेंजर ट्रेन ‘हब अँड स्पोक मोडेल’ वर चालणार आहेत. 10 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असणाऱ्या शहरांमध्ये हे हब असतील. छोट्या स्टेशनला हबशी अन्य ट्रेनद्वारे जोडलं जाईल.
– त्याशिवाय, प्रमुख पर्यटन स्थळांना देखील हबचा दर्जा दिला जाणार.
– नव्या वेळापत्रकानुसार मुंबई लोकल सारखे सबअर्बन नेटवर्क प्रभावित असणार नाहीत.
– ट्रेनमध्ये एकतर 22 एलएचबी कोचेस किंवा 24 इंटिग्रल कोच फॅक्ट्रीचे कोचेस असणार आहेत.