बहुजननामा ऑनलाइन टीम – India vs Pakistan | T20 वर्ल्डकपला (T20 World Cup) उद्यापासून सुरुवात होणार आहे. पहिल्या फेरीतील संघांमध्ये सुपर 12 मध्ये जाण्यासाठी जोरदार चुरस निर्माण होणार आहे. या स्पर्धेत भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात 23 ऑक्टोबर रोजी सामना होणार आहे. हा सामना म्हणजे क्रिकेट रसिकांसाठी एक पर्वणीच म्हणावी लागेल. या सामन्याची सर्व तिकीटं विकली गेली आहे आणि काल एक्स्ट्रा तिकीटही 10 मिनिटांत संपली. मागच्या वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाला साखळी फेरीतच बाहेर पडावे लागले होते. यानंतर आता रोहितने दोन्ही देशांतील ‘कट्टर’ चाहत्यांवरून मोठे भाष्य केले आहे.
भारतीय संघ T-20 वर्ल्ड कप स्पर्धेत मागच्या वर्षापर्यंत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानकडून एकदासुद्धा हरलेला नव्हता. मात्र मागच्या वर्षी भारताला पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात भारताला एकही विकेट मिळाली नाही. बाबर (Babar Azam) व मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) या दोघांनीच 153 धावांचे लक्ष्य सहज पार केले. यानंतर आशिया चषक 2022 (Asia Cup 2022) स्पर्धेत हे दोन संघ पुन्हा एकदा भिडले त्यात 1-1 अशी बरोबरी झाली. यानंतर आता हे दोन्ही संघ 23 ऑक्टोबर T-20 वर्ल्डकपमध्ये एकमेकांशी भिडणार आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
रोहितने दोन्ही देशांतील ‘कट्टर’ चाहत्यांना सुनावले
आम्ही आशिया चषक स्पर्धेदरम्यान भेटलो होतो, तेव्हा आम्ही एकमेकांच्या कुटुंबियांची विचारपूस केली,
घरच्या गप्पा मारल्या. कोणती कार घेतली किंवा घेणार आहात हेही विचारले.
आम्ही आधीच्या जनरेशननेही आम्हाला अशाच काही चर्चा मैदानावर खेळाडूंमध्ये व्हायच्या असं सांगितलं आहे.
भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) लढतीचे महत्त्व आम्ही जाणतो,
परंतु सतत त्याचा विचार करून तणाव वाढवून घेत नाही असे रोहित यावेळी म्हणाला.
Web Title :- India vs Pakistan | t20 world cup 2022 rohit sharma on india vs pakistan we understand the importance of the game against them but theres no point talking about it all time
हे देखील वाचा :