नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय संघानं एकदिवसीय मालिका गमावली. त्यानंतर चहुबाजुंनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडण्यात आले. परंतु, भारतीय संघानं टी-२० मालिकेत विजय संपादन केलं. आणि विजयचा शिकामोर्तब केला. भारतीय संघाच्या मालिका विजयानंतर सर्वच स्तारातून भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. भारतीय संघानं तीन सामन्याच्या टी-२० मालिकेत २-० नं आघाडी घेतली आहे. हार्दिक पांड्याच्या तुफानी फलंदाजीनंतर भारतीय संघानं दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सहा गड्यांनी पराभव केला होता. मराठमोळ्या वसीम जाफर आपल्या विनेदी मीम्समुळे नेहमीच चर्चेत असतो. भारताच्या विजयानंतरही जाफरनं मीम्स ट्विट करत इंग्लंडच्या खेळाडूवर निशाणा साधला आहे.
दरम्यान, इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने, यंदाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टीम इंडिया सर्व मालिकांमध्ये पराभूत होईल असा दावा केला होता. पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने खराब कामगिरी केली होती. तेव्हा मायकल वॉन यानं ट्विट करत आपलं मत मांडलं होतं. आता भारतीय संघानं विजय मिळवल्यानंतर मायकल वॉनच्या ट्विटला जाफरनं त्याला प्रतिउत्तर दिल.
यावेळी, जाफरशिवाय इतर भारतीय नेटकऱ्यांनीही इंग्लंडच्या मायकल वॉनवर टार्गेट केलं. भारतीय संघाचा माजी खेळाडू आणि पंजाब संघाचा कोच वसीम जाफरनं “गँग्स ऑफ वासेपूर”च्या या चित्रपटातील एक मिम्स शेअर केलं आहे. या मिम्समधून भारत जिंकला असल्याचं मायकल वॉनला सांगत ट्रोल केलं आहे.
दुसऱ्या सामन्यात भारताचा विजय
कर्णधार मॅथ्यू वेडच्या तुफानी ५८ धावा आणि त्याला स्टीव्ह स्मिथने (४६) दिलेली साथ यांच्या बळावर ऑस्ट्रेलियाने १९४ धावांची धावसंख्या उभारली होती. या आव्हानाचा पाठलाग करताना शिखर धवनचं अर्धशतक (५२) आणि हार्दिक पांड्याच्या धडाकेबाज नाबाद ४२ धावांच्या जोरावर भारतीय संघाने सामना ६ गडी राखून जिंकला. ऑस्ट्रेलियाच्या संघाला त्यांच्यात मैदानात मात देत भारताने दुसरा टी२० सामना जिंकला. मालिकेत २-० अशी अजिंक्य आघाडी घेतली.