बहुजननामा ऑनलाईन
कोरोना व्हायरस महामारीविरूद्ध लढाईत भारतासाठी सप्टेंबर महिना खुप वाईट ठरत आहे. जॉन्स हापकिन्स युनिव्हर्सिटीच्या आकडेवारीनुसार, महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात ज्या लोकांना संसर्ग झाला, त्यांची संख्या कोरोना संसर्गाने दुसरा सर्वात जास्त प्रभावित देश अमेरिकेत समोर आलेल्या प्रकरणांच्या संख्येच्या दुप्पटीपेक्षा जास्त आहे. अशाप्रकरे प्रकरणांमध्ये रोजच वेगाने वाढ झाल्याने भारतात सप्टेंबरमध्ये 11 दिवसांच्या विक्रमी वेळेत 10 लाखांपेक्षा जास्त प्रकरणे समोर आली.
भारतात 15 दिवसात 13,08,991 प्रकरणे समोर आली, अमेरिकेत 5,57,657 प्रकरणे नोंदली गेली आणि ब्राझील जो या यादीत तिसर्या स्थानावर आहे, तेथे 4,83,299 प्रकरणे नोंदली गेली. एवढेच नाही तर व्हायरसमुळे झालेल्या मृत्यूच्या यादीत सुद्धा भारत सर्वात वर आहे. भारतात 15 दिवसांच्या कालावधीत 16,307 लोकांचा मृत्यू झाला, तर अमेरिका आणि ब्राझीलमध्ये अनुक्रमे 11,461 आणि 11,178 मृत्यूंची नोंद झाली.
मृत्युदराच्या यादीत प्रमुख 3 स्थानांवर मेक्सिको, कोलंबिया आणि पेरू
मात्र, या 15 दिवसांच्या कालावधी दरम्यान मृत्यूदराचा विचार केल्यास, भारत 1.25% च्या दराने 8 व्या स्थानावर आहे. यादीत प्रमुख तीन स्थानांवर मेक्सिको, कोलंबिया आणि पेरू हे देश आहेत.
कोविड-19 चाचणीत वाढ झाल्याने प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. ज्यामुळे 15 सप्टेंबरपर्यंत भारतात 5.8 कोटींच्या विक्रमी आकड्यापर्यंत पोहचली होती. भारताला आपली चाचणी क्षमता 1 कोटींवरून 2 कोटींपर्यंत दुप्पट करण्यात 27 दिवस लागले होते, परंतु यास केवळ 10 दिवसात 4 कोटी चाचण्यांवरून 5 कोटी चाचण्यांपर्यंत पोहचवले.