बहुजननामा ऑनलाईन – भारताशिवाय इतर देशामध्ये पाहिले तर गरिबी दूर करण्यात पेरु,कंबोडिया,बांग्लादेश,नायजेरीया, इथोपिया, व्हीएतनाम,पाकिस्तान,हैती आणि कॉंन्गो गणराज्य या देशांचा समावेश आहे गरिबी दूर करण्यासाठी प्रयत्न करणार्या महत्वपुर्ण दहा देशामध्ये भारताचाही समावेश आहे. मल्टीडायमेंशनल पॉवर्टी इंडेक्स 2019 (mpi)च्या रिपोर्टमध्ये ही माहिती समोर आली आहे.
भारतातील बिहार,झारखंड,उत्तर प्रदेश,आणि मध्य प्रदेशात सर्वाधिक एमपीआय आहे अस रिपोर्ट च्या माहितीनुसार स्पष्ट झालेलं आहे. दरम्यान झारखंडने यामध्ये सर्वाधिक चांगले कार्य केलेले आहे . झारखंड राज्यात २००५-०६ ते २०१५-१६या दहा वर्षात गरिबी 74.9 वरुन 46.5 टक्के कमी राहीलेली आहे. महत्त्वाच म्हणजे भारत या देशाचा असा तीन देशामध्ये समावेश झाला आहे की ज्या ठिकाणी ग्रामीण भागात कमी होणार गरीबीचं प्रमाण शहरापेक्षाही जास्त असल्याच समोर आलं आहे. गरीबी कमी केल्यामुळे जगभरात भारताचे कौतुक होत आहे. एमपीआयमध्येही भारताने चांगली कामगिरी केलेली आहे. भारताने देशभरात गरीबी दूर करण्यात यश मिळवलेले आहे. अशी प्रतिक्रीया भारतातील निवासी प्रतिनीधी शोको नोडा यांनी दिली आहे.
रिपोर्टच्या माहितीनुसार भारतांने गरीबी जास्त प्रमाणात दूर केलेली आहे . भारतातील गरीबी ५५.१ टक्क्यावरुन कमी करत २७.९ टक्के म्हणजेच जवळपास आर्धी आणलेली आहे. याअगोदर भारतात गरीब लोकांची संख्या 64 कोटी एवढी होती जी आता 56.9 कोटींवर आलेली आहे. इतर देशाच्या तुलनेत पाहिले तर भारताने गरिबी दूर करण्यात यश मिळवलेले आहे.
गरिबी कमी प्रमाणात आणण्यासाठी १० महत्वाच्या गोष्टीचा विचार केला जातो.त्यांमध्ये स्वयंपाक, संपत्ती, इंधन,स्वच्छता आणि पोषण या मुख्य बाबींचा यामध्ये समावेश आहे. गरिबांना दारिद्र्य रेषेतून बाहेर काढण्यासाठी गरिबांच्या फायद्याच्या विकासासाठीच्या महत्वाची गोष्ट राबवली हेच स्पष्ट होतं.