बहुजननामा ऑनलाईन – लडाखमध्ये भारत आणि चीन सीमारेषेवरील तणावानंतर चीनच्या वेगवेगळ्या मार्गाने कुरापती सुरू आहेत. त्याला रोखण्यासाठी आणि चीनला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारतही सज्ज झाला आहे. आता समुद्रातही चीनची कुरघोडी रोखण्यासाठी भारताने नवीन प्लॅन तयार केला आहे.
नौदलाची ताकद वाढवण्यासाठी भारत 6 पाणबुड्या खरेदी करण्याच्या तयारीत आहे. या पाणबुड्या खरेदी करण्यासाठी भारताने 55000 कोटींची निविदा काढल्याची माहिती मिळाली आहे. ही प्रक्रिया ऑक्टोबर महिन्यापासून सुरू होणार असून लवकरच भारताकडे 6 पाणबुड्या येणार आहेत. चीनच्या नौदलाची शक्ती लक्षात घेऊन या पाणबुड्या खरेदी कऱण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पाणबु़ड्या नौदलाच्या ताफ्यात दाखल झाल्यानंतर भारताची सामरिक क्षमता वाढणाार आहे. संरक्षण मंत्रालयाने या प्रकल्पासाठी 2 भारतीय शिपयार्ड आणि 5 परदेशी संरक्षण कंपन्यांची नावे शॉर्टलिस्ट केली आहेत. ’मेक इन इंडिया’ अंतर्गत हा सर्वात मोठे मोठा प्रकल्प असणार आहे. अंतिम यादीमध्ये भारतीय कंपन्यांचा समावेश एल अँड टी ग्रुप आणि गव्हर्नमेंट मझागाव डॉक लिमिटेड (एमडीएल) आहे तर निवडलेल्या परदेशी कंपन्यांमध्ये थायसीनक्रूप मरीन सिस्टम (जर्मनी), नवानतिया (स्पेन) आणि नेवल ग्रुप (फ्रांस) यांचा समावेश आहे.