बहुजननामा ऑनलाइन टीम – येत्या काही दिवसांत पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहे. त्यामुळे येथील राजकीय वातावरण तापू लागले आहे. येथील एका सभेला संबोधित करताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee)यांनी राष्ट्रगीत बदलण्याच्या मागणीवरून भाजप आणि मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.हिंमत असेल तर भाजपने राष्ट्रगीत बदलून दाखवावं त्यांना योग्य उत्तर दिलं जाईल असं खुलं आव्हानही ममता बॅनर्जी यांनी दिलं आहे.
राष्ट्रगीत बदलण्यासंदर्भात भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी एक पत्र लिहिलं होतं.
सीएए आणि एनपीआरमुळे कोणालाही घाबरण्याची गरज नाही
आम्ही पश्चिम बंगालमध्ये निर्वासितांच्या कॉलनींना मान्यता दिली आहे. भाजपा कधीही गोरखालँडबाबत समस्येचा कायमस्वरूपी तोडगा काढू शत नाही. केवळ तृणमूल काँग्रेसचं असं करू शकते त्यामुळे सीएए आणि एनपीआरमुळे कोणालाही घाबरण्याची गरज नाही.असे सांगत केंद्र सरकार राज्याच्या अधिकार क्षेत्रात हस्तक्षेप करत आहे असा आरोपही ममता बॅनर्जी यांनी केला आहे.
काही दिवसांपूर्वी भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या ताफ्यावर कोलकाता दौर्यात दगडांनी हल्ला करण्यात आला. त्यासंदर्भातही त्यांनी खुलासा केला आहे. त्या म्हणाल्या की, माध्यमाद्वांरे भाजपा नागरिकांना सभेपर्यंत आणू शकली नाही. यासाठीच हल्ल्याचा डाव रचला होता का? त्यांनी व्हिडीओ कसे काय तयार केले? बीएसएफ आणि सीआरपीएफची सुरक्षा असताना तुम्हाला कोणी हातही लावू शकेल का? असं ममता यांनी म्हटलं आहे. तसेच “देशाच्या गृहमंत्र्यांना काही काम नाही. उठसूठ पश्चिम बंगालमध्ये येतात. कधी कोण नेता तर कधी मंत्री येतात. आता चड्डा, नड्डा, फाड्डा, गड्डा आलेत. त्यांना राज्यात जनतेचं कुठलंही समर्थन नाही. यामुळे ते आपल्या कार्यकर्त्यांना नाटक करायला लावत आहे असा हल्लाबोल ममता बॅनर्जी यांनी भाजपावर केला आहे.
आपले स्वतःचे व्हिडिओ रेकॉर्ड करत आहेत आणि माध्यमांकडे पाठवत आहेत. माध्यमांकडून हे व्हिडिओ दिवसभर चालवले जात आहेत. त्यांनी माध्यमांनाही विकत घेतलं आहे आरोपही बॅनर्जी यांनी केला आहे.