जमैका : वृत्तसंस्था – भारत-वेस्ट इंडिज दौरा आपल्या खिशात घातल्यानंतर आता विराट कोहली भारताचा सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारा कर्णधार ठरला आहे. विराटच्या नेतृत्वाखाली भारताचा हा 28वा विजय आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने 27 कसोटी सामने जिंकले आहेत. विराटने आता माहीला मागे टाकले आहे. त्यामुळे आता कसोटी सामन्यात सर्वाधिक सामने जिंकण्यात विराट पहिल्या क्रमांकावर आहे.
वेस्ट इंडिज दौऱ्यावर विराट कोहलीनं ऐतिहासिक कामगिरी केली असली तरी या दौऱ्यावर त्याला मोठा धक्का बसला आहे. कारण त्याला फलंदाजीत विशेष कामगिरी करता आली नाही. विराट कोहली दुसऱ्या कसोटी सामन्यात तर पहिल्याच चेंडूत बाद झाला. याचा फटका बसल्याने त्याची कसोटी रँकिंगवर परिणाम झाला आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथनं विराट कोहलीला आयसीसी कसोटी रँकिंगमध्ये मागे टाकले आहे.
https://twitter.com/ICC/status/1168815905595449344
या कारणामुळं विराटला फटका
कसोटी क्रिकेटमध्ये विराट कोहलीने पहिल्या डावात अर्धशतक केलं. यावेळी 76 धावांवर विराट बाद झाला. दुसऱ्या कसोटी सामन्यात मात्र विराट पहिल्याच चेंडूत शु्न्यावर बाद झाला. हेच कारण आहे की, विराट दुसऱ्या क्रमांकावर आला. आयसीसीच्या ताज्या रँकिंगनुसार, कोहलीचे 903 अंक आहेत. तर स्टीव्ह स्मिथचे 904 अंक आहेत. शुन्यावर बाद झाल्याने विराटला 7 अंकांचा फटका बसला.
कोहलीच्या 4 डावात 134 धावा
कसोटी क्रिकेटमध्ये विराट कोहलीला फलंदाजीमध्ये चांगली कामगिरी करता आली नाही. दोन सामन्यातील चार डावात विराटने 136 धावा केल्या. यात एक अर्धशतकाचा समावेश असून विराटनं 34 च्या सरासरीने धावा केल्या आहेत.
टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारत अव्वल
भारताने विंडिजविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका जिंकल्याने भारताची वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये विजयी सुरुवात झाली आहे. चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात 120 गुणांसह भारताने अव्वल स्थान मिळवले आहे. तर न्युझिलंड दुसऱ्या स्थानावर आहे. श्रीलंकाविरुद्ध कसोटी मालिकेत न्युझिलंडने एक विजय मिळवला तर एक पराभव न्युझिलंडच्या वाट्याला आला.