नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रेशनकार्डच्या माध्यमातून सरकार त्यांच्या राज्यात राहणाऱ्या कुटुंबाना रेशन पुरवते. केवळ रेशनकार्डच्या माध्यमातून गरीब व्यक्तीला रेशन दिले जाते. अनेक ठिकाणी आयडी प्रूफ म्हणून रेशनकार्डचा वापर केला जातो. उदाहरणार्थ एलपीजी कनेक्शन, ड्रायव्हिंग लायसन्स इ. हे ऍड्रेस प्रूफ म्हणून मान्य केले जातात. परंतू येथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हजे रेशनकार्ड प्रत्येकजण बनवू शकत नाही. हे केवळ विशिष्ट उत्पन्नाच्या गटासाठी आहे. ज्याचे प्रमाण राज्यात वेगवेगळे आहे. आपण देखील आपले रेशनकार्ड बनविण्यासाठी प्रयत्न करीत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे.
‘हे’ लोक रेशनकार्डसाठी अर्ज करू शकतात
भारतीय नागरिकत्व असणारा देशातील प्रत्येक नागरिक रेशनकार्डसाठी अर्ज करू शकतो. १० वर्षाखालील मुलांना पालकांच्या रेशनकार्डमध्ये जोडले जाते. दुसरीकडे, जर तुमचे वय १८ वर्षांपेक्षा अधिक असेल तर आपण रेशनकार्डसाठी अर्ज करू शकता.
‘ही’ कागदपत्रे आवश्यक
>> मतदान ओळखपत्र आवश्यक आहे.
>> आधार कार्ड
>> कुटुंब प्रमुखाचा पासपोर्ट साईज फोटो (२ पासपोर्ट साईज फोटो)
>> वीज/ पाणी/ फोन बिल (कोणतेही एक)
>> भारत सरकारद्वारे देण्यात आलेला दस्तऐवज, असेल तर
अर्ज ‘कसा’ कराल
>> राज्य सरकारकडून रेशनकार्ड दिले जाते म्हणून रेशनकार्डसाठी अर्ज करण्याची पद्धत प्रत्येक राज्याची वेगळी आहे.
>> रेशनकार्डसाठी फक्त ऑफलाईन अर्ज करता येईल, तर काही ठिकाणी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा आहे.
>> तुम्ही उत्तर प्रदेशचे असाल तर https://fcs.up.gov.in/FoodPortal.aspx वर जाऊन आपण फॉर्म डाउनलोड करू शकता.
>> यानंतर त्यातील सर्व आवश्यक माहिती भरून आपल्या भागातील रेशन डीलर किंवा अन्न पुरवठा विभागाच्या कार्यालयाकडे द्या.
>> अर्जासाठी तहसील कार्यलयात या कार्याशी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क करू शकता.
>> अर्जदारास रेशनकार्डसाठी अर्ज करायचा असल्यास कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये अर्ज करता येईल.
>> रेशनकार्ड फॉर्म सबमिट केल्यानंतर स्लिप घेण्यास विसरू नका.
>> रेशनकार्डसाठी अर्ज फी ५ रुपयांपासून ४५ रुपयांपर्यंत आहे.
उत्पन्नाच्या आधारे तयार केले जातात रेशन कार्ड्स
साधारणतः तीन प्रकारची शिधापत्रिका असते. दारिद्र रेषेच्या वर असणाऱ्यांसाठी APL, दारिद्र रेषेखाली असणाऱ्यांसाठी BPL आणि सर्वात गरीब कुटुंबासाठी अंत्योदय. या श्रेणीचे विभाजन एखाद्या व्यक्तीच्या वार्षिक उत्पन्नाच्या आधारे केले जाते. याशिवाय वेगवगेळ्या शिधापत्रिकांवर स्वस्त दरात उपलब्ध असलेल्या वस्तू, त्यांचे प्रमाण बदलते. दारिद्र रेषेखालील किंवा अंत्योदय योजनेची शिधापत्रिका मिळविण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्रे द्यावी लागतील.