नवी दिल्ली : वृत्त संस्था – हार्वर्ड युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर आणि सायंटिस्ट एव्ही लोएब यांनी नुकतेच जगभरातील शास्त्रज्ञांना विचारले की, अखेर जग कधीपर्यंत राहील ? मनुष्याचा समाज कधीपर्यंज जिवंत राहील ? पृथ्वी नष्ट होण्याची किंवा मनुष्य नष्ट होण्याची तारीख कोणती असेल ? कारण त्यांना वाटते की सायंटिस्ट योग्य दिशेने काम करत नाहीत. एव्ही लोएब यांनी शास्त्रज्ञांना आवाहन केले की, त्यांनी जलवायु परिवर्तन रोखण्यासाठी काम करावे. व्हॅक्सीन बनवावी. सातत्याने उर्जेचे पर्याय शोधावेत. सर्वांना अन्न मिळेल याची पद्धत शोधावी. अंतराळात सर्वात मोठे बेस स्टेशनन बनवण्याची तयारी करावी. सोबतच एलियन्सशी संपर्क करण्याचा प्रयत्न करावा. कारण ज्या दिवशी आपण तंत्रज्ञानाच्या बाबतीत पूर्णपणे मॅच्युअर होऊ, त्या दिवशी मनुष्याची पूर्ण पीढी आणि पृथ्वी नष्ट होण्यासाठी तयार होईल. त्यावेळी हेच शोध आणि तंत्रज्ञान काही माणसांना वाचवतील.
हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांच्या संमेलनात संबोधित करताना एव्ही लोएब यांनी म्हटले सर्वात महत्वाचे आहे मनुष्याचे वय वाढवणे. कारण मला विचारले गेले आहे की, आपले तंत्रज्ञान संस्कृती किती वर्ष जिवंत राहील. अशावेळी माझे उत्तर आहे की, आपण आपल्या जीवनाच्या मध्यभागात आहोत. आपल्या तंत्रज्ञान संस्कृतीची सुरूवात शेकडो वर्षे अगोदर झाली होती. तेव्हा हे मुल होते. आता आपण त्याची किशोरावस्था पहात आहोत. ती लाखो वर्षे शिल्लक राहू शकते. आपण सध्या आपल्या टेक्नॉलॉजिकल जीवनाचे तरूणपण पहात आहोत. हे काही शतकांपर्यंत जिवंत राहू शकते परंतु यापेक्षा जास्त नाही. हे एका गणितीय गणनेच्या आधारावर लोएब यांनी सांगितले.
https://twitter.com/LiveScience/status/1395711041389187079
एव्ही लोएब यांनी म्हटले की, ज्याप्रकारे पृथ्वीची आवस्था मनुष्यामुळे खराब होत आहे, त्यावरून वाटते की, मनुष्य जास्त दिवस पृथ्वीवर राहू शकत नाही. काही शतकात पृथ्वीची आवस्था इतकी खराब होईल की, लोकांना स्पेसमध्ये जाऊन राहावे लागेल. सर्वात मोठा धोका तंत्रज्ञान आपत्तीचा आहे. ही तांत्रिक आपत्ती जलवायु परिवर्तनाशी संबंधीत असेल. याशिवाय दोन मोठे धोके आहेत मनुष्याद्वारे विकसित महामारी आणि देशांमधील युद्ध. या सर्वांबाबत सकारात्मक दृष्ट्या काम केले नाही तर मनुष्यांना पृथ्वी स्वता नष्ट करून टाकेल. किंवा ती स्वताला नष्ट करेल. हे सुद्धा होऊ शकते की, मनुष्याच्या हालचालींमुळे पृथ्वीवर इतका अत्याचार होईल की, ती स्वताच नष्ट होईल.
एव्ही लोएब यांनी म्हटले की, मनुष्य त्या धोक्यांपासून स्वताला वाचवू शकत नाहीत, ज्याच्याशी त्यांनी अगोदर सामना केलेला नाही. जसे जलवायु परिवर्तन. याच्यामुळे लागोपाठ वेगवेगळ्या देशांमध्ये हवामान परिवर्तन होत आहे. ग्लेशियर वितळत आहेत. समुद्राची पातळी वाढत आहे. शेकडो वर्षांपासून निद्रीस्त ज्वालामुखी पुन्हा आग ओकू लागले आहेत. जंगले आगीत भस्मसात होत आहेत. ऑस्ट्रेलियाची आग कुणीच विसरू शकत नाही. कोट्यवधी जीव त्यामध्ये मारले गेले.
फिजिक्सचे सामान्य मॉडल सांगते की, आपण सर्व एलिमेंट्री पार्टिकल्स म्हणजे मूलतत्वाने बनलो आहोत. यामध्ये वेगळे काहीही जोडलेले नाही. यासाठी नैसर्गिक नियमांच्या आधारावर आपल्याला मूलभूत स्तरावर यात छेडछेड करण्याचा कोणताही अधिकार नाही. कारण सर्व मूलतत्व फिजिक्सच्या नियमांनुसार आपसात संबंध बनवतात किंवा बिघडवतात. जर यामध्ये छेडछेडीचे स्वातंत्र्य मिळाले तर यामुळे नुकसान होईल.