नवी दिल्ली : बहुजननामा ऑनलाईन – अयशस्वी सरकारसाठी आश्रय घेण्यासाठी युद्ध हा एकमेव पर्याय आहे का ? आपण आपल्या पोकळ राजकीय हेतूंसाठी किती निष्पाप जिव आणि जवान बलिदान कराल ? असा प्रश्न सुद्धा नवजोत सिंह सिद्धू यांनी उपस्थित केल्यामुळे राजकीय वर्तुळात एकाच खळबळ माजली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंजाब सरकार मध्ये काँग्रेसचे में मंत्री असलेले नवजोत सिंह सिद्धू यांनी एक ट्विट केले आहे.नवजोत यांनी पंतप्रधानाचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या युद्धाच्या स्थितीचा निषेध केला आहे. सिद्धू म्हणाले की ज्या युद्धात राजाचे जीवन धोक्यात आले नाही. ते युद्ध नाही तर राजकारण आहे.
ज्या युद्धात राजाचे जीवन धोक्यात आले नाही त्याला युद्ध नाही. राजकारण म्हणतात -चाणक्य. ‘ यानंतर सिद्धूने इंग्रजीत एक ओळ लिहीली. याचा अर्थ युद्ध म्हणजे अयशस्वी सरकारसाठी आश्रय आहे. किती निर्दोष जिवे आणि जवान राजकीय हेतूंसाठी बलिदान द्यावे