नवीदिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू – काश्मीर पोलीसचा निलंबित उपअधीक्षक दविंदर सिंहसोबत अटक केलेला दहशतवादी संघटनेचा कमांडर नवीद बाबूने आपल्या संबंधाची माहिती देण्यास सुरूवात केली आहे. चौकशीत त्याने सांगितले की, नुकत्याच बरखास्त झालेल्या विधनसभेच्या एका अपक्ष आमदाराच्या संपर्कात तो होता. नवीद उर्फ बाबू ज्याचे पूर्ण नाव सैयद नवीद मुस्ताक अहमद आहे, सध्या राष्ट्रीय तपास एजन्सी (एनआयए) च्या ताब्यात आहे. एनआयए त्या प्रकरणाचा तपास करत आहे, ज्यामध्ये जम्मू-काश्मीर पोलीसचा उप अधीक्षक दविंदर सिंह सहभागी आहे आणि 11 जानेवारीला नवीदसह दहशतवाद्यांना खोर्यातून बाहेर पोहचवण्यासाठी मदत करताना सापडला होता.
आमदाराच्या नियमित संपर्कात होता दहशतवादी
अधिकार्यांच्या माहितीनुसार नवीदने दावा केला आहे की, उत्तर कश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा मजबूत ठिकाणा बनवण्यासाठी तो आमदाराच्या नियमित संपर्कात होता आणि लपण्यासाठी संभाव्य परिसराचा शोध घेत होता. विशेष म्हणजे जम्मू काश्मीरमध्ये तीन अपक्ष आमदार होते. दविंदर सिंह आणि नवीदशिवाय स्वत:ला वकील म्हणत असलेला रफी अहमद रादर आणि इरफान शफी मीर यांना त्याच दिवशी काजीगुंडमध्ये श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्गावर अटक करण्यात आली होती. आरोपींची अनेक दिवस चौकशी केल्यानंतर प्रकरण एनआयएकडे सोपवण्यात आले होते. अधिकार्यांनी सांगितले की, चौकशीत नवीदने हिजबुल मुजाहिदीनमधील त्याच्या भूमिकेबाबत अनेक गोष्टी सांगितल्या. परंतु, मीर सीमेच्या दोन्हीकडील प्रमुख दहशतवाद्यांशी संपर्कात असल्याचे दिसून आले.
लवकरच चंदीगडमध्ये जाणार होता
त्यांनी सांगितले की नवीदने दिलेल्या माहितीवरून अनेक ठिकाणी छापेमारी करण्यात आली. दहशतवादी संघटनांसाठी भूमिगत राहून काम करणार्या काही लोकांना पकडण्यात आले. अधिकार्यांनी सांगितले की, लागोपाठ चौकशी केल्यानंतर नवीदने अपक्ष आमदारासह संपर्काची माहिती देण्यास सुरूवात केली. नंतर 23 जानेवारीला नवीदचा भाऊ सैयद इरफान अहमदला पंजाबमधून अटक करण्यात आली. नवीद सतत आपल्या भावाच्या संपर्कात होता. त्यास काश्मीरच्या कडाक्याच्या थंडीपासून बचाव करण्यासाठी चंदीगडमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यास सांगितले होते.
दविंदर सिंहने दहशतवाद्याला जम्मूला आणण्यासाठी केली मदत
त्यांनी सांगितले की, मागच्या वर्षी सुद्धा दविंदर सिंहने बाबूला जम्मूला आणण्यासाठी आणि आराम व आरोग्य उपचारांनतर शोपियांला परत जाण्यास मदत केली होती. अधिकार्यांच्या माहितीनुसार नवीदने चौकशीत सांगितले की, पोलिसांपासून बचाव करण्यासाठी तो पहाडीभागात रहात होता आणि थंडीपासून बचाव करण्यासाठी परिसर सोडत होता.