मुंबई बहुजननामा ऑनलाईन – मुंबईत पुढील दोन दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मुंबईत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. शुक्रवारी मुंबईत पावसाने सकाळपासून जोर धरला आहे. तर मागील काही दिवसांपासून मुंबईला पावसाने झोडपून काढले आहे. त्यानंतर पुढील दोन दिवसात पावसाचा इशारा दिल्याने मुंबईत अजून दोन दिवसात हाय अलर्टची स्थिती आहे.
पश्चिम किनारपट्टीच्या भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मुंबईसह किनारपट्टीच्या भागात शनिवारी आणि रविवारी मुसळधार पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाचे उपमहासंचालक के. स. होसळीकर यांनी ट्वीटरवरून ही माहिती दिली आहे. त्यामुळे किनारपट्टी भागातही हवामान विभागाने अति दक्षतेचा इशारा दिला आहे.
Rainfall Updates.
With the development of low pressure area over Bay, this Saturday night and Sunday, Mumbai is very likely to get intense heavy rainfalls.
Warnings are issued including West coast.
TC and watch for updates please.https://t.co/tC52tQTo04https://t.co/eAIy8vzk7e pic.twitter.com/jxEa9dpUyP— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 2, 2019
मुंबईमध्ये मागील काही दिवसात पावसाने घाटकोपर, मुलुंड, भांडूप, कल्याण, ठाणे, पालघर, मालाड, बोरीवली, जोगेश्वरी अशा अनेक ठिकाणांना पावसाने झोडपून काढले आहे. त्यावेळी मुंबईत अनेक ठिकाणी पावसाचे पाणी भरल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. त्यामुळे मुंबईकरांसाठी पुढील दोन दिवस महत्त्वाचे आहेत.