पुणे बहुजननामा : महाराष्ट्रात गेल्या ८ दिवसांपासून अतिवृष्टी होत आहे, त्यात पश्चिम महाराष्ट्राला चांगलेच झोडपून काढले आहे. महापुराचे रौद्र रूप पाहिलेल्या कोल्हापूर आणि सांगलीला आता वेध शाळेने पुन्हा एकदा सतर्कतेचा इशारा दिला आहे. १३ आणि १४ तारखेला पुणे घाट, कोल्हापूर आणि सांगलीमध्ये मुसळधार पावसाचे संकेत दिले आहे.
आता कुठे पूर ओसरून कोल्हापूर आणि सांगलीमध्ये पुनर्वसनासाठी प्रयत्न सुरु होते, परंतु वेध शाळेने दिलेल्या या इशाऱ्यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. दरम्यान राज्याच्या इतर ठिकाणी हलक्या सरी बरसल्या आहेत. सोमवारी पाऊसाने विश्रांती घेतली होती. परंतु आता वेध शाळेने दिलेल्या अंदाजामुळे चिंतेच वातावरण आहे. कोकणात देखील तुरळक पासून पडणार असल्याचेही अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आले आहे. महाराष्ट्रात पुरामुळे बळी पडलेल्यांची संख्या ४३ वर पोहोचली असून अजूनही काही लोक बेपत्ता आहे. लाखोंच्या वर नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कोल्हापुरात चारा छावणीला भेट दिली. तसेच पूरग्रस्तांना मदत करणाऱ्या तरुणांनचे कौतुक देखील केले. कोल्हापूरला येण्याची इच्छा होती, मात्र येऊ शकलो नाही. असे हि त्यांनी सांगितले. मोठमोठ्या कलाकार नेत्यांपासून सर्वसामान्य नागरिक देखील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले आहे. कोल्हापूर, सांगलीतील पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राधानगरी धरणाचे दरवाजे आता बंद करण्यात आले आहे. यामुळे पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात थांबला असून पूर ओसरण्यास मदत झाली आहे.
तर पाठ दाखवणाऱ्या मराठवाड्यालाही पावसाने जरा सुखावले आहे. जायकवाडी धरण ८७ टक्के भरलं असून, आज पाणी सोडणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे गोदावरी नदीच्या किनाऱ्यावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पुरामुळे गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत , गावच्या गावं उध्वस्त झाली आहेत. संसार कोलमडले आहेत. घरांतील सगळे सामान भिजून खराब झाले आहे. त्यामुळे आता नागरिकांना आता पुनर्वसनासाठी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. आपला संसार पुन्हा सुरळीत करण्याचे आव्हान त्यांच्यापूढे आहे. कोल्हापूरमध्ये आता एकेरी वाहतूक सुरु आहे, तसेच उपयुक्त वस्तूंच्या गाड्या रवाना करण्यात आल्या आहे. परंतु कोल्हापूर मध्ये मोठं प्रश्न निर्माण झाला आहे तो म्हणजे पेट्रोल चा इंधनासाठी पेट्रोल पंपावर रांग लागल्या आहेत.