नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरस या शतकातील सर्वात मोठा आजार आहे, ज्याने देश आणि जगातील 12 कोटी 47 लाख लोकांना बाधित केले आहे. या आजारासाठी व्हॅक्सीन आली असली तरी कोरोना पुन्हा वेगाने वाढत आहे. या आवघड काळात कोरोनाला शरीरात प्रवेश करण्यापासून कसे रोखावे ते जाणून घेवूयात.
या मसाल्यांनी सुरूवातीलाच नष्ट होऊ शकतो व्हायरस :
हा व्हायरस सुरुवातीच्या स्तरावर मारण्यासाठी हळद, ओवा, पिंपळी, काळीमिरी, दालचीनी आणि सैंधव मीठाचा काढा बनवून रोज घ्यावा. काढा चहा एवढा गरम असावा.
गुळण्या करा :
हळद आणि सैंधव मीठ मिसळून गरम पाण्याने गुळण्या करा. यामुळे व्हायरस नष्ट होतो.
सोशल डिस्टन्सिंग :
सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर हा सर्वात मोठा उपाय आहे. त्याचा वापर करा.
घरात हे लक्षात ठेवा :
घरात येताच कपडे बदला, हात-तोंड धुवा. गरम पाणी प्या.
हळद आणि दूध :
रात्री झोपण्यापूवी हळदीच्या दुधाचे सेवन करा. यामुळे इम्यूनिटी वाढते आणि अनेक आजार दूर राहतात.
हा काढा सेवन करा :
लवंग, पिपळी, मोठी वेलची आणि दालचीनी पाण्यात उकळवून काढा बनवा. तो गाळून दिवसात एकदा प्या.
चेहर्याला स्पर्श
वारंवार नाक किंवा तोंडाला हाताने स्पर्श करू नका. हात सतत धुवा.