नवी दिल्ली : Gratuity Claim | दिल्लीतील एका मल्टीनॅशनल कंपनीत काम करणाऱ्या अमित कुमारने चांगली ऑफर आल्यानंतर कंपनी बदलली. नवीन कंपनीत मोठे काम आणि चांगला पगार मिळाला पण जुन्या कंपनीने त्याला ग्रॅच्युइटी (Gratuity Claim) देण्यास नकार दिला.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
त्याच्या जुन्या कंपनीने असा दावा केला की अमितने कंपनीत सलग ५ वर्षे काम केले नाही, त्यामुळे ग्रॅच्युइटी नाकारली जात आहे.
अमित कुमारने कंपनीत ४ वर्षे ९ महिने काम केल्यानंतर नोकरी बदलली होती. कंपनीने दावा केला की त्याने ५ वर्षे पूर्ण केली नाहीत, त्यामुळे ग्रॅच्युइटीचे पैसे देता येणार नाहीत. परंतु, ग्रॅच्युइटी कायद्याचे नियम पाहिले असता, ५ वर्षे पूर्ण न करताही ग्रॅच्युइटीचा अधिकार मिळतो. याच नियमाचा आधार घेत अमितने ग्रॅच्युइटीचा दावा केला आहे. (Gratuity Claim)
काय सांगतो ग्रॅच्युइटी अॅक्ट
ग्रॅच्युइटी अॅक्ट १९७२ अन्वये कर्मचार्यांना हा अधिकार मिळतो की, ५ वर्षांपेक्षा कमी काम केले असले तरीही त्यांना ग्रॅच्युइटी मिळते. साधारणपणे, जर एखादा कर्मचारी एकाच कंपनीसोबत ४ वर्षे २४० दिवस (४.८ वर्षे) सलग काम करत असेल, तर तो ग्रॅच्युइटी मिळण्यास पात्र ठरतो.
यानुसार ४.९ वर्षे काम केल्यानंतर अमितला देखील ग्रॅच्युइटी मिळण्याचा हक्क प्राप्त झाला आहे. ग्रॅच्युइटी कायद्यात स्पष्टपणे नमूद केले आहे की, जर एखादा कर्मचारी ४ वर्षे ८ महिन्यांपेक्षा कमी काळ काम करत असेल तर त्याला ग्रॅच्युइटी मिळण्याचा अधिकार मिळणार नाही.
जर एखादा कर्मचारी भूमिगत खाणींमध्ये किंवा अशा कोणत्याही भूमिगत ठिकाणी काम करत असेल तर त्याला
त्यापूर्वीच ग्रॅच्युइटी मिळण्याचा अधिकार आहे. ग्रॅच्युइटी कायदा म्हणतो की भूमिगत खाणी, मेट्रो किंवा रेल्वे लाईन
किंवा बोगद्याच्या बांधकामात गुंतलेल्या कर्मचाऱ्यांना ४ वर्षे १९० दिवस पूर्ण केल्यानंतर ग्रॅच्युइटी मिळण्याचा
अधिकार आहे.
अमितने काय केले पाहिजे
अमितला त्याची ग्रॅच्युइटी मिळवण्याचा पूर्ण अधिकार आहे, त्यामुळे त्याने सर्व कागदपत्रांसह कंपनीच्या एचआरकडे
दावा केला पाहिजे. कंपनीने ग्रॅच्युइटी देण्यास नकार दिल्यास जिल्हा कामगार आयुक्तांकडे तक्रार करता येईल.
अशी प्रकरणे निकाली काढण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या कामगार आयुक्तांकडे एक टीम असते,
जी कंपनीकडून व्याज आणि दंडासह ग्रॅच्युइटीची रक्कम वसूल करण्याचे काम करते.
- Share Market | १३ कंपन्यांसाठी ‘परिसस्पर्श’ ठरले चांद्रयान-३ चे लँडिंग, भांडवल वाढले २०,००० कोटीने
- Income Tax Refund | इन्कम टॅक्स रिटर्न मिळणार लवकर; आयकर विभागातर्फे केला जाऊ शकतो कालावधीमध्ये बदल
- Katraj Kondhwa Road | कात्रज-कोंढवा रस्त्याच्या कामाला गती! 50 पोलीस कर्मचाऱ्यांसह महावितरणच्या कार्यकारी अभियंत्याची नियुक्ती