बहुजननामा ऑनलाइन टीम – नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे आज उत्तराखंडला जात होते. तर तेव्हा ते विमानतळावर येताच त्यांना राज्य सरकार कडून विमान उपलब्ध करून दिले नाही. विमानाला उड्डाण करण्यासाठी मंत्रालयाकडून परवानगी मारण्यात आल्याने राज्यपाल याना प्रवासी विमानाने जावे लागले. या प्रकरणावरून भाजप हे महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका करत आहे. यावरूनच खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे की, जे काही झालं ते नियमाला धरूनच झालेलं आहे. भाजपच्या लोकांनी आरोप करण्याची गरज नाही, राज्यपाल काही भाजपचे नाहीत ते महाराष्ट्राचे आहेत,अशा शब्दांत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजप नेत्यांना प्रत्युत्तर दिले आहे.
तसेच, महाराष्ट्र शासनाच्या विमान परवानगी देणाऱ्या विभागाकडे राज्यपालांसाठी विमान प्रवासासाठी परवानगीची मागणी झाली. त्यानंतर रितसर परवानगी द्यावी, यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाकडे पत्र पाठवले पण परवानगी देण्यात आली नाही. राजभवन कार्यालयाने सुद्धा यासंदर्भात माहिती जाणून घेणे अपेक्षित आहे. पण याबद्दल कोणतीही विचारपुस करण्यात आली नाही. राज्यपाल आज सकाळी थेट राजभवनातून निघाले आणि विमानतळावर पोहोचले. मुख्यमंत्री कार्यालयाकडून परवानगी दिली गेली नसल्याने राज्यपालांना विमान दिले गेले नाही, अशी माहिती वरिष्ठ आयएएस अधिकारी यांनी दिली आहे.
या दरम्यान, या प्रकरणावर संजय राऊत यांनी आपल्या शैलीत भाजप नेत्यांना खडेबोल सुनावले आहे. राज्यपाल प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत दूरध्वनीवर बोलणे झाले. जे काही झालं ते नियमाला धरूनच झालेला आहे. भाजपच्या लोकांनी आरोप करण्याची गरज नाही, राज्यपाल काही भाजपचे नाहीत. ते महाराष्ट्राचे आहेत’, असं राऊत म्हणाले आहेत. तसेच राज्य सरकारने १२ राज्यपाल नियुक्त आमदारांची शिफारस केली आहे. पण अजूनही बारा आमदारांच्या नियुक्त्या होत नाहीत हा राज्यघटनेचा सर्वात मोठा अपमान आहे, असा निशाणाही खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांवर साधला आहे.