बहुजननामा ऑनलाइन – कोरोनाने मार्चपासून भारतात पाय रोवण्यास सुरुवात केली होती. परिस्थिती सुधारण्यासाठी मार्चच्या अखेरीस लॉकडाऊन लागू करण्यात आले होते. त्यामुळे देशातील( indian economy) आर्थिक घडामोडी ठप्प झाल्या होत्या. बरेच उद्योग अजूनही पूर्णपणे बंद आहेत. परंतु यादरम्यान, ( indian economy)सरकारसाठी बर्याच चांगल्या बातम्या आल्या आहेत. वास्तविक, कोरोना संकटामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर सर्वाधिक परिणाम झाला आहे. आर्थिक वर्ष 2020-21 च्या पहिल्या तिमाहीत जीडीपी 23.9 टक्क्यांनी घसरला आहे. पण ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवशी एकामागून एक अर्थव्यवस्थेशी संबंधित दिलासादायक चार बातम्या आल्या आहेत.
विजेच्या वापरात वाढ
विजेच्या वापरात होणारी वाढ ही अर्थव्यवस्थेत सुधारणा होण्याचे संकेत दर्शवते आणि सप्टेंबर महिन्यात विजेच्या वापरात लक्षणीय वाढ नोंदविण्यात आली आहे. सप्टेंबरमध्ये देशातील एकूण विजेचा वापर 5.6 टक्क्यांनी वाढून 113.54 अब्ज युनिट झाला आहे. याआधी सलग 6 महिन्यांपर्यंत एकूण वीज वापरात घट झाली होती. विजेच्या वापरात होणारी वाढ म्हणजेच कोरोना साथीच्या काळात आता औद्योगिक आणि व्यावसायिक क्रियाकलाप वेगाने वाढत आहेत. वीज मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये 107.51 अब्ज युनिट वीज वापरली गेली होती. एप्रिलमध्ये विजेचा वापर 23.2 टक्के, मे मध्ये 14.9 टक्के, जूनमध्ये 10.9 टक्के, जुलैमध्ये 3.7 टक्के आणि ऑगस्टमध्ये 1.7 टक्क्यांनी घसरला.
जीएसटी कलेक्शनमध्ये वाढ
सरकारची तिजोरी हळू हळू पुन्हा भरत आहे. सप्टेंबरमध्ये जीएसटी कलेक्शनमध्ये विक्रमी वाढ झाली आहे. अर्थ मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार सप्टेंबरमध्ये वस्तू व सेवा कर (जीएसटी) कलेक्शन 95480 कोटी रुपये होते, जे मागील वर्षाच्या सप्टेंबरच्या तुलनेत 4 टक्क्यांनी जास्त आहे. सप्टेंबर-2019 मध्ये एकूण जीएसटी कलेक्शन 91,916 कोटी रुपये होते. याशिवाय मागील महिन्याच्या तुलनेत म्हणजेच ऑगस्टच्या तुलनेत जीएसटी कलेक्शनमध्ये वाढ झाली आहे. ऑगस्टमध्ये जीएसटी कलेक्शन 86,449 कोटी रुपये होते.
सप्टेंबर महिन्याचा मॅन्युफॅक्चरिंग पीएमआय जवळजवळ 9 वर्षांच्या उच्चांकावर
याशिवाय सप्टेंबरमध्ये कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मॅन्युफॅक्चरिंग फ्रंटकडूनही एक चांगली बातमी आली आहे. पीएमआयच्या आकडेवारीनुसार सप्टेंबरमध्ये मॅन्युफॅक्चरिंग उपक्रम साडे आठ वर्षांच्या उच्चांकापर्यंत पोहोचले. सप्टेंबरमध्ये सलग दुसर्या महिन्यात देशात मॅन्युफॅक्चरिंग (मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर) उपक्रमांमध्ये सुधारणा झाली आहे. आयएचएस मार्केट इंडियाचा मॅन्युफॅक्चरिंग पर्चेसिंग मॅनेजर इंडेक्स (पीएमआय) सप्टेंबरमध्ये वाढून 56.8 वर पोहोचला. ऑगस्टमध्ये तो 52 वर होता. पीएमआय 50 पेक्षा जास्त होणे म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग गतिविधी वाढत आहे आणि 50 पेक्षा कमी होण्याचा अर्थ असा आहे की तो कमी होत आहे. जानेवारी 2012 नंतरची ही पीएमआयची उच्च पातळी आहे.
बेरोजगारीच्या दरातही सुधारणा
रोजगाराच्या बाबतीतही सप्टेंबरच्या परिस्थितीत थोडी सुधारणा झाली आहे, ज्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात राष्ट्रीय पातळीवरील बेरोजगारीचा दर कमी होऊन 6.7 टक्क्यांवर आला आहे. ऑगस्टमध्ये 8.3 टक्के नोंद झाली आहे, तर जुलैमध्ये बेरोजगारीचा दर 7.4 टक्के होता. या संदर्भात सप्टेंबरअखेर बेरोजगारीचा दर 6.7 टक्क्यांपर्यंत येणे, याकडे अर्थव्यवस्थेतील सुधारणा म्हणून पाहिले जात आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) च्या आकडेवारीनुसार 29 सप्टेंबर रोजी देशातील शहरी भागात बेरोजगारीचे प्रमाण 8.5 टक्के आणि ग्रामीण भागात बेरोजगारीचे प्रमाण 5.8 टक्के होते. दरम्यान शहरी भागात बेरोजगारीची परिस्थिती सुधारली आहे, परंतु अद्यापही ती बिकट अवस्थेत आहे.