बहुजननामा ऑनलाइन टीम – नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मान्सून पुन्हा एकदा देशात सक्रिय झाला आहे. अनेक राज्यांमध्ये जोरदार पावसामुळे स्थिती खुप बिघडली आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने पुढील 24 तासात जोरदार पावसाबाबत अॅलर्ट जारी केला आहे. आयएमडीनुसार, येत्या 24 तासात ओडिसा, झारखंड़, छत्तीसगढ, पूर्व-पश्चिम मध्य प्रदेश आणि पश्चिम उत्तर प्रदेशच्या अनेक भागात जोरदार पावसामुळे पुराचा धोका आहे.
आयएमडीचा संदर्भ देत केंद्रीय जल आयोगाने म्हटले की, जम्मू-काश्मीर उपखंडातील काही क्षेत्रात पुराचा धोका आहे. बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने ओडिसामध्ये बुधवारी जबरदस्त पाऊस झाला, ज्यामुळे राज्याच्या विविध भागात पूराची शक्यता निर्माण झाली आहे. पावसामुळे राज्याच्या सखल भागातील परिसर बुडाले आहेत, संपर्क तुटला आहे आणि किमान दोन लोकांचा मृत्यू झाला आहे.
High risk of flash flood for next 24 hours over some areas of Odisha, Jharkhand, Chhattisgarh, East MP & adjoining West UP & West MP subdivision. Moderate risk over some areas of Jammu & Kashmir subdivision also: Central Water Commission Official Flood Forecast citing IMD pic.twitter.com/4jb7iWmOZ0
— ANI (@ANI) August 27, 2020
विशेष मदत आयुक्त पीके जेना यांनी सांगितले की, मंगळवारपासून राज्यात सर्व 30 जिल्ह्यात वेगवेगळ्या तीव्रतेचा पाऊस होत आहे. राज्याच्या 9 जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाला, ज्यामुळे सखल परिसरात पाणी भरले आहे. राज्यात मागील 24 तासात सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 76.6 मिमी पावसाची नोंद झाली, जर 9 जिल्ह्यात हा आकडा 100 मिमीपेक्षा जास्त होता. याच कालावधीत राज्यात चार विभागात सरासरी 200 मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला.
भुवनेश्वर आणि कटकमध्ये अनुक्रमे 92 मिमी आणि 77 मिमी पाऊस नोंदला गेला आहे. जेना यांनी सांगितले की, राज्यातील केंद्रपाड़ा, मयूरभंज, क्योंझर आणि जगतसिंहपुरसारख्या जिल्ह्यांमध्ये अनेक सखल भाग पाण्याखाली बुडाले आहेत. यामध्ये धान्याच्या शेतीचा आणि रस्त्यांचा सुद्धा समावेश आहे. पाणी काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जेना यांनी सांगितले की, मयूरभंज जिल्ह्याच्या सुकुरीली परिसरात महुआसूली गावात भिंत पडल्याने 62 वर्षाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे पोलीसांनी सांगितले की, मयूरभंज जिल्ह्यात एक ट्रक उलटल्याने चालकाचा मृत्यू झाला.