नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जेव्हा 2020 वर्ष सुरू झालं तेव्हा कोणी अशी महामारी येईल याचा विचारही केला नव्हता. सुरुवातीच्या काळात भारतात कोरोना चाचणीची एकच लॅब होती. पंरतु आता देशभरात 1600 लॅब आहेत. भारतातील कोरोनामुळं होणारा मृत्यूदर देखील इतर देशांच्या तुलनेत कमी आहे असं पतंप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं आहे. भारत-अमेरिका स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरमला (USISPE) संबोधित करताना ते बोलत होते. ग्लोबल सप्लाय चेन विकसित करण्यासाठी विश्वास महत्त्वाचा आहे हे या महामारीनं दाखवून दिलं आहे असंही मोदी म्हणाले.
पीएम मोदी म्हणाले, “या वर्षाच्या सुरुवातीला कोरोनासारखी महामारी येईल असं कोणालाही वाटलं नव्हतं. परंतु या महामारीचा जगातील सर्वांवर परिणाम झाला. ही महामारी सार्वजनिक आरोग्य व्यवस्था, आर्थिक प्रणालीची परीक्षा घेत आहे. सद्यस्थितीत विकासासाठी मानव केंद्रीत दृष्टीकोन ठेवणं आवश्यक आहे.” असंही ते म्हणाले.
When 2020 began, did anyone imagine how it would pan out? A global pandemic has impacted everyone. It’s testing our resilience, public health system & economic system. The current situation demands fresh mindset where the approach to development is human-centric: PM Narendra Modi pic.twitter.com/bHAduQmymk
— ANI (@ANI) September 3, 2020
मोदी म्हणतात, “लोकांचा कोरोनामुक्त होण्याचा भारतातील दरही वेगानं वाढत आहे. देशातील व्यायसायिक, उद्योजक उत्तम काम करत आहेत. पीपीई किट तयार करणारा भारत आता जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश ठरला आहे.”
The pandemic has impacted several things but it has not impacted the aspirations and of ambitions of 1.3 billion Indians. In recent months, there have been far reaching reforms. These are making business easier and red-tapism lesser: PM Narendra Modi pic.twitter.com/SDWYVxx1MO
— ANI (@ANI) September 3, 2020
पीएम मोदी म्हणाले, “एकीकडे कोरोनाचं संकट आहे. अशात दुसरीकडे 2 चक्रीवादळासारख्या नैसर्गिक संकटांचा सामना केला आहे. सध्या भारतात 80 कोटी जनतेला मोफत धान्य पुरवलं जात आहे. तसंच 80 दशलक्ष लोकांना मोफत स्वयंपाकाचा गॅस दिला जात आहे. महामारीमुळं अनेक गोष्टींवर परिणाम झाला आहे. परंतु ही महामारी भारतीयांच्या आकांक्षांवर परिणाम करू शकणार नाही” असंही त्यांनी यावेळी नमूद केलं.
हळूहळू परिस्थितीत सुधारणा
पीएम मोदी असंही म्हणाले, “गेल्या काही महिन्यांपासून परिस्थितीत सुधारणा होत आहे. जगातील सर्वात मोठ्या हाऊसिंग प्रोग्रामवरही काम सुरू आहे. रेल्वे, रोड एअर कनेक्टीव्हिटी वाढवली जात आहे. पायाभूत सुविधांच्या क्षेत्रातही मोठं काम सुरू आहे.” असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.