बुलढाणा : बहुजननामा ऑनलाईन – डॉ. बाबासाहेबांची पत्रकारिता माणूस, समाज , राष्ट्र, प्रबुद्ध करणारी पत्रकारिता आहे. या पत्रकारितेने स्वतंत्र, बंधुता, व शोषणमुक्त समाजाचा पाया रचल्याने लोकशाहीचा मूलभूत घटक असलेला माणूस हा शक्तिवान झाला. या पत्रकारितेने संविधानिक जीवन पद्धती समृद्ध करीत प्रजासत्ताक देश उभा केला. मूकनायक, जनता, समता, प्रबुद्ध भारत, या बाबासाहेबांच्या वृत्तपत्रातील दीर्घकाळ अमर असलेले कृतिशील विचार हे वैश्विक मानव मुक्तिचा जिवंत प्रेरणादायी दस्तऐवज असल्याचे प्रतिपादन जेष्ठ पत्रकार सोमनाथ साळवे यांनी केले.
रिपब्लिकन न्यूज पेपर्स असोशिएशन च्या वतीने आंबेडकरी चळवळीच्या पत्रकार दिनानिमित्त आयोजित प्रोबोधन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विचार मंचावर शिवभिम क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष अभय सिंह पाटील, मराठी पत्रका परिषदेचे उपाध्यक्ष राजेंद्र काळे, पोलीस निरक्षसक यादव उपस्तित होते.