बहुजननामा ऑनलाइन टीम – कोझिकोड विमान दुर्घटनेनंतर विमानतळ प्राधिकरण यंत्रणा सतर्क झाली आहे. पुन्हा एकदा या दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कोलकातास्थित नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दुसर्या धावपट्टीच्या बांधकामात मस्जीद अडथळा ठरली आहे. या मस्जीदवरून पुन्हा एकदा वाद उफाळण्याची शक्यता आहे.
विमानाची धावपट्टी तयार करताना सुरक्षेच्या दृष्टीने काही अंतर ज्यादा सोडणे गरजेचे असते. त्यामुळे कोणतीही दुर्घटना होणार नसल्याची शक्यता कमी असते. मात्र कोलकाता विमानतळाची धावपट्टी तयार केल्यानंतर पुढे अगदी लागूनच मस्जीद आहे. त्यामुळे अंतर सोडण्यासाठी जागा उरत नाही. त्यामुळे ही मस्जीद स्थलांतरीत करण्याबाबत विमान प्राधिकरणाने प.बंगालच्या सरकारकडे विनंती केली. परंतु सरकारकडून कोणतेही सहकार्य मिळत नसल्याचे विमानतळ प्राधिकरणने सांगितले आहे. कोलकाता विमानतळावर दुसरी धावपट्टी तयार केल्याने एका धावपट्टीवर येणार्या विमानांची संख्या कमी करून ती दुसरीकडे वळवता येणार आहे. याशिवाय कोलकाता विमानतळावर मोठ्या विमानांची संख्या वाढत असल्यामुळे दुसर्या धावपट्टीची गरज आहे.