नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने शकरपूर भागात एनकाउंटरदरम्यान पाच आतंकवाद्यांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आतंकवाद्यांपैकी दोन पंजाब आणि तीन काश्मीरचे आहेत. हे सर्व इस्लामी आणि खालिस्तानी संघटनांशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे. बर्याच दिवसांपासून ऑपरेशन चालू होते. या क्षणी पोलीस थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेतील.
सूत्रांच्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या पाच आतंकवाद्यांपैकी दोन पंजाबमधील आहेत. हे सर्व जण तरनतारनमधील शौर्य चक्र विजेता बलविंदरसिंग संधू यांच्या हत्येमध्ये सामील होते. बलविंदरसिंग यांनी पंजाबमधील आतंकवाद्यांच्याविरोधात दीर्घ लढा दिला. नुकतीच पंजाबच्या तरनतारन जिल्ह्यात त्यांची हत्या करण्यात आली. सध्या आतंकवाद्यांना अटक करण्यात आली असून, पोलीस त्यांच्याकडे चौकशी करत आहेत.
दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरजीतसिंग आणि सुखदीपसिंग हे पंजाबमधील गुरदासपूर येथील रहिवासी आहेत. यांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय जम्मू-काश्मीरमधील अयुब पठाण, शब्बीर आणि रियाझ यांना पोलिसांनी एन्काउंटरमध्ये अटक केली आहे. या लोकांचा वापर पाकिस्तानची गुप्तचर संस्था भारतात आतंकवाद आणि अमली पदार्थांच्या तस्करीसाठी करत होते.