मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्ये प्रकरणी तपास लांबत चालत असल्याने यावर मुंबई उच्च न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. तर आज पुन्हा एकदा न्यायालयाने CBI आणि SIT तपास यंत्रणांना सुनावले आहे. तर कर्नाटकातील अशाच प्रकारच्या घटनाचं उदाहरण देत उच्च न्यायालयाने तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
दरम्यान, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या होऊन ८ वर्षे झाली आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येला ६ वर्षे होत आली. तर आणि किती कालावधी तुमचा तपास सुरू राहणार? असं उच्च न्यायालायने म्हटलं आहे. तसेच कर्नाटकात आपल्या राज्यानंतर झालेल्या विचारवंतांच्या हत्यांच्या घटनांप्रकरणी खटलाही सुरू झाला असेल तर इथे अद्याप आपल्या महाराष्ट्रात खटले सुरू का झाले नाहीत? असा खडा प्रश्नही मुंबई उच्च न्यायालयाने याप्रकरणी तपास करत असलेल्या CBI आणि SIT शाखेला विचारला आहे. तसेच आम्ही दोन्ही तपास यंत्रणांच्या कामाविषयी शंका घेत नाही पण प्रामाणिकपणे प्रयत्न सुरू असल्याचे दिसले पाहिजे, नाहीतर जबाबदार अधिकाऱ्यांपैकी कोणालाही सोडणार नाही, अशा शब्दात थेट इशारा उच्च न्यायालयाने सीबीआय आणि एसआयटीला दिला आहे.
पुढे, अशाने जनतेच्या विश्वासाला तडा जातो. शेवटी अशा संवेदनशील प्रकरणांत तपास गांभीर्याने होतो आहे. आणि खटलाही चालवला जातोय, असा संदेश जनतेमध्ये जाणेही आवश्यक आहे. अशा घटना पुन्हा घडणार नाहीत, याची खबरदारी घेणेही आवश्यक आहे. असे आपले निरीक्षणही आज न्या. संभाजी शिंदे आणि न्या. मनीष पितळे यांच्या खंडपीठाने नोंदवले आहे.