बहुजननामा ऑनालाइन – देशभरात कोरोना व्हायरसने विळखा घटट केला आहे. त्यापार्श्वभूमीवर सरकारला पाठिंबा देण्यासाठी आणि कोरोनाविरुद्ध लढाई जिंकण्यासाठी काँग्रेसने पंतपृधान नरेंदृ मोदी यांच्यासमोर 10 मागण्या मांडल्या आहेत. त्यामुळे कोरोना व्हायरसचा परिणाम कमी होउ शकतो असे काँग्रेसचे पृवक्ते रणजित सूरजेवाला यांनी नमूद केले आहे.
काय आहेत काँग्रेसच्या 10 मागण्या?
1) आरोग्य विभागात काम करणार्यांच्या सुरक्षेसाठी मास्क, ग्लोव्ह्ज, फेस शील्ड, गॉगल्स, हँड कव्हर्स, रबराचे बूट, डिस्पोजेबल गाऊन उपलब्ध करुन द्यावेत जेणेकरुन करोनापासून त्यांचा बचाव होऊ शकेल
2) देशातील डॉक्टर्स, नर्सेस आणि त्यांना मदत करणार्या कर्मचार्यांना विशेष आर्थिक मदत दिली पाहिजे. सरकारने त्यासाठीची घोषणा तातडीने करावी
3) कोरोनाग्रस्तांची संख्या लक्षात घेऊन केंद्र सरकारने व्हेंटीलेटर्सची संख्या वाढवावी . 130 कोटीच्या देशात सध्याच्या घडीला फक्त 30 हजार व्हेंटीलेटर्स आहेत.
4) रुग्णांसाठी आयसोलेशन बेड्सची व्यवस्था करण्यात यावी. जेणेकरुन त्यांचा संसर्ग इतरांना होणार नाही
5) कोरोनाची लागण झाली आहे की नाही? हे जाणून घेण्यासाठी तपासण्या वाढवण्याची गरज आहे कारण आत्तापर्यंत फक्त 16 हजार लोकांचीच चाचणी करण्यात आली आहे.
6) देशभरात हँड सॅनिटायझर्स, मास्क आणि लिक्विड सोप यांचा काळा बाजार वाढला आहे. हा काळा बाजार करणार्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे. तसंच भाज्या, डाळी, कांदे, बटाटे यांचे दर रोज वाढवणार्यांवरही कारवाई केली पाहिजे.
7) रोज मजुरी करणारे लाखो लोक, मनरेगाचे मजूर, इतर कामगार, शेतकरी आणि असंघटीत क्षेत्रात काम करणार्यांच्या हाताला काम नाही त्यांना सरकारने आर्थिक मदत करावी.
8) करोनामुळे बळीराजावर मोठं संकट ओढावलं आहे. आधीच त्रस्त असलेला शेतकरी आणखी त्रस्त झाला आहे त्यामुळे शेतकर्यांनाही आर्थिक मदत द्यावी.
9) लघू आणि मध्यम व्यावसायिक यांचंही करोनामुळे मोठे नुकसान झाले आहे सरकारने त्यांच्यासाठी विशेष पॅकेज जाहीर करावे
10) करोनामुळे मध्यमवर्गीय लोक, पगारी काम करणारे कर्मचारी यांनाही मोठ्या समस्यांचा सामना करावा लागतो आहे. त्यांनाही मदत करावी.