बहुजननामा ऑनलाईन – देशभरात कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता पुन्हा लॉकडाऊन लागणार का? अशी भीती अनेकांना वाटत आहे. अशातच येत्या 15 ते 20 दिवसात देशात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होणार असल्याची चिंता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. आयआयटी कानपूरचे प्रा. मनिंद्र अग्रवाल यांनी गणितीय मॉडेलच्या आधारे काही निरीक्षण नोंदवली असून त्या आधारे त्यांनी कोरोनावाढीचा इशारा दिला आहे.
प्रा. अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या 15 ते 20 दिवसात दरोज 80 ते 90 हजार कोरोना रुग्णांची भर पडणार आहे. ही आकडेवारी यापेक्षाही जास्त असण्याची शक्यता आहे. नंतर काही दिवसांनी यात घसरण होण्याची शक्यता आहे. गेल्या 6 महिन्यानंतर कोरोना रुग्णसंख्येने नवा उच्चांक नोंदवला आहे. शुक्रवारी (दि. 2) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात 24 तासांत कोरोनाचे 81 हजार 466 नवे रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 1,23,03,131 वर पोहोचली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 1, 63 हजार 369 वर पोहचला आहे. या संकटात दिलासादायक बाब म्हणजे 1, 15, 25, 039 लोकानी कोरोनावर मात केली आहे.