नवी दिल्ली : वृत्त संस्था – देशात वेगाने कोरोना रूग्ण वाढत असताना थोडे अस्वस्थ करणारे वृत्त आले आहे. कोरोनावर लक्ष ठेवून असलेल्या तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, पुढील काही दिवसात कोरोना पीक वर असेल. कोरोना व्हायरसबाबत नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी पुढील चार आठवडे खुप महत्वाचे सांगितले आहेत, तर आयआयटी कानपुरच्या टीमने गणितीय मॉडेलच्या आधारे म्हटले आहे की, देशात कोरोनाची लाट 20 ते 25 एप्रिलच्या दरम्यान उच्च स्तरावर असेल.
आयआयटी कानपुरचे प्रोफेसर मनिंद्र अग्रवाल यांच्यानुसार कोरोनाची दुसरी लाट पहिल्यापेक्षा जास्त धोकादायक दिसत आहे. 15 एप्रिलला कोरोनाच्या केसने 2 लाखांचा आकडा गाठला आहे. अजूनही संकट कमी झालेले नाही. आमच्या टीमने ज्या गणितीय मॉडेलने कोरोना वर लक्ष ठेवले आहे त्यानुसार 20 ते 25 एप्रिल दरम्यान हा आकडा दोन लाखांपर्यंत पोहोचायला हवा होता. मात्र, स्थिती इतकी बदलली आहे की, पीक व्हॅल्यू बदलत चालली आहे. आम्हाला वाटते की, 20 ते 25 एप्रिलच्या दरम्यान कोरोना पीकवर असेल. यानंतर थोडा दिलासा मिळू लागेल.
अग्रवाल यांनी सांगितले की, 25 एप्रिलच्या नंतर कोरोनापासून दिलासा मिळणे सुरू होईल आणि अॅक्टिव्ह केस कमी होऊ लागतील. मे च्या अखेरीस स्थिती चांगली होऊ लागेल. प्रोफेसर अग्रवाल यांनी सांगितले की, सर्व राज्यांमध्ये एक सामान्य स्थिती दिसून येईल. जिथे कोरोनाच्या केस सर्वात जास्त आहेत, तिथे सुद्धा मे च्या अखेरपर्यंत स्थिती सामान्य होऊ लागेल. सध्याची लाट मागील लाटेपेक्षा वेगळी आहे. रोज नोंदले जात असलेले मृत्यू मागच्या वेळच्या संसर्गापेक्षा कमी आहेत. व्हॅक्सीन आल्यानंतर लोकांनी निष्काळजीपणा सुरू केला, ज्यामुळे कोरोनाच्या आकड्यांमध्ये वाढ झाली आहे.