नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोना व्हायरसचा वेग थांबताना दिसत नाही. देशात गुरुवारपर्यंत 16 लाख 38 हजार 870 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. असे प्रथमच झाले आहे जेव्हा कोरोनाच्या नव्या रूग्णांची संख्या एका दिवसात 55 हजारांपेक्षा जास्त झाल्याचे समोर आले आहे. आरोग्य मंंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गुरुवारी विक्रमी 55 हजार 078 रूग्ण वाढले. या दरम्यान, 779 लोकांनी आपला जीव गमावला. तर यापूर्वी बुधवारी 52 हजार 146 केस समोर आल्या होत्या आणि 775 लोकांचा मृत्यू झाला होता.
आरोग्य मंत्रालयाच्या आकड्यांनुसार, देशात कोरोनाच्या सध्या 5 लाख 45 हजार 318 अॅक्टिव्ह केस आहेत. कोरोना महामारीमुळे आतापर्यंत 35 हजार 747 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 10 लाख 57 हजार 805 लोक बरे झाले आहेत. कोरोना रूग्णांचा रिकव्हरी रेट 64.44% झाला आहे. कोरोना व्हायरसमुळे महाराष्ट्र सर्वात प्रभावित झाल्याचे दिसून येत आहे.
या राज्यात सर्वात जास्त अॅक्टिव्ह केस
देशात कोरोनाच्या सर्वात जास्त अॅक्टिव्ह केस महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात एक लाखपेक्षा जास्त संक्रमितांवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. यानंतर दुसर्या नंबरवर तमिळनाडु, तिसर्या नंबरवर कर्नाटक, चौथ्या नंबरवर आंध्र प्रदेश आणि पाचव्या नंबरवर दिल्ली आहे. या पाच राज्यांमध्ये सर्वात जास्त अॅक्टिव्ह केस आहेत. अॅक्टिव्ह केसच्या प्रकरणात जगात भारत चौथ्या क्रमांकावर आहे.
आतापर्यंत किती झाली टेस्टींग
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) कडून सांगण्यात आले आहे की, 30 जुलैपर्यंत 1 कोटी 88 लाख 32 हजार 970 लोकांच्या कोरोना सॅम्पलची तपासणी करण्यात आली आहे. गुरुवारी 6 लाख 42 हजार 588 लोकांची टेस्टींग झाली.
महाराष्ट्रात दिवसात आले सर्वाधिक रूग्ण
महाराष्ट्रात गुरूवारी एका दिवसात सर्वात जास्त 11,147 नवी प्रकरणे समोर आल्याने राज्यात संक्रमित रूग्णांची एकुण संख्या वाढून 4,11,798 झाली आहे. आरोग्य विभागानुसार दिवसात 266 रूग्णांचा संसर्गामुळे मृत्यू झाला. नव्या आकड्यांनंतर राज्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता 14,729 झाली आहे.
गुरुवारी 8,860 रूग्णांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला, ज्यानंतर कोरोनाच्या एकुण बरे झालेल्या रूग्णांची संख्या 2,48,615 झाली आहे. राज्यात संसर्गातून बरे होण्याचा दर 60.37 आहे, तर मृत्यूदर 3.58 टक्के आहे.
गुजरातमध्ये कोरोनाच्या केस 60 हजारच्या पुढे
गुजरातमध्ये गुरूवारी कोरोनाची एका दिवसात 1,159 नवी प्रकरणे समोर आली, ज्यामुळे राज्यात एकुण संक्रमितांची संख्या वाढून 60,000पेक्षा जास्त झाली आहे. राज्यात एकुण प्रकरणे वाढून 60,285 झाली आहेत. बुधवारी सायंकाळपासून कोविड-19 च्या आणखी 22 रूग्णांचा मृत्यू झाला, ज्यामुळे राज्यातील एकुण मृतांची संख्या वाढून 2,418 झाली आहे.
गोव्यात 215 नवी प्रकरणे, एकुण प्रकरणे 5,704
गोवामध्ये गुरूवारी कोविड-19 ची 215 नवी प्रकरणे समोर आल्याने राज्यात आतापर्यंत एकुण 5,704 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. बुधवारी 221 लोकांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. या सोबतच गोवामध्ये आतापर्यंत 4,005 लोक उपचारानंतर बरे झाले आहेत. तर 1,657 लोकांवर सध्या उपचार सुरू आहेत. राज्यात आतापर्यंत 42 लोकांचा मृत्यू झाला आहे.
बिहारमध्ये आतापर्यंत 285 मृत्यू
बिहारमध्ये कोरोना व्हायरस संक्रमणामुळे मागील 24 तासात आणखी 12 लोकांचा मृत्यू झाल्याने एकुण मृतांची संख्या वाढून 285 वर पोहचली आहे. तर आतापर्यंत संक्रमितांची एकुण संख्या 48,001 झाली आहे. बिहारमध्ये मागील 24 तासात भोजपुरमध्ये 4, रोहतासमध्ये 3 तर जहानाबाद, मुंगेर, पश्चिम चंपारण, पूर्व चंपारण आणि वैशाली जिल्ह्यात 1-1 रूग्णाचा मृत्यू झाल्याने राज्यात गुरूवारी कोरोना व्हायरसने मृत्यू होणार्यांची संख्या वाढून 285 झाली आहे.
राजस्थानमध्ये 1,156 नवी प्रकरणे
राजस्थानमध्ये कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे गुरुवारी आणखी 13 लोकांचा मृत्यू झाला, ज्यामुळे राज्यात एकुण मृतांची संख्या 667 झाली आहे. या सोबतच राज्यात आतापर्यंत सर्वात जास्त 1,156 नवी प्रकरणे समोर आल्याने एकुण संक्रमित रूग्णांची संख्या 40936 झाली आहे, ज्यापैकी 10,817 रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
भारत जगातील तिसरा सर्वात प्रभावी देश
कोरोना संक्रमितांच्या संख्येनुसार भारत अमेरिका, ब्राझीलच्यानंतर जगातील तिसरा सर्वात प्रभावित देश आहे. जर प्रति 10 लाख लोकसंख्येवर संक्रमित प्रकरणे आणि मृत्यूदराचा विचार केला तर अन्य देशाच्या तुलनेत भारताची स्थिती चांगली आहे. भारतापेक्षा जास्त प्रकरणे अमेरिका (4,634,966), ब्राझील (2,613,789) मध्ये आहेत. देशात कोरोन प्रकरणे वाढण्याचा वेगाच्या बाबतीत सुद्धा भारत जगात तिसर्या नंबरवर आहे.