नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एकीकडे काँग्रेस पक्ष राजस्थानात सत्ता वाचवण्यात गुंतला आहे, काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडलेली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसच्या अध्यक्ष पदावरून पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधींना पत्र लिहिल्याचा उल्लेख करत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत नाराजी व्यक्त केली. तसंच या पत्रामागे भाजपाचे षडयंत्र असल्याचं सांगत राहुल गांधी यांनी नेत्यांना फटकारलं होतं. परंतु आता काही घडलंच नाही असं स्पष्टीकरण पक्षाचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद आणि कपिल सिब्बल यांनी स्पष्ट दिलं आहे.
गुलाम नबी आझाद यांनी ट्विट करत स्पष्टीकरण दिलं आहे. ट्विटमध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की, भाजपाच्या सांगण्यावरून काँग्रेस नेत्यांनी सोनिया गांधींना पत्र लिहलं असं राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत म्हटलेलं नाही. त्यांनी असं बाहेरदेखील कुठं म्हटलेलं नाही. या वक्तव्यावरून आपण माझे भाजपासोबत संबंध असल्याचं सिद्ध केल्याचं मी राजीनामा देईन असं वक्तव्य प्रसारमाध्यमांनी दाखवलं आहे. ही चुकीची माहिती असून मी असं काहीही म्हटलं नाही असं ते म्हणाले आहेत.
A section of media is wrongly attributing that, in CWC I told Shri Rahul Gandhi to prove that the letter written by us is in collusion with BJP-“let me make it very clear that Shri Rahul Gandhi has neither in CWC nor outside said that this letter was written at the behest of BJP"
— Ghulam Nabi Azad (@ghulamnazad) August 24, 2020
खरं तर आम्ही भाजपाच्या सांगण्यावरून सोनिया गांधी यांना पत्र लिहिलं अशा प्रकारचं वक्तव्य काल काही काँग्रेस नेत्यांनी (काँग्रेस कार्यकारिणी समितीच्या बाहेरील) केल्याचं मी म्हटलं आहे. त्यावर अशा प्रकारचे आरोप करणं अतिशय चुकीचं आहे असं त्यांनी आणखी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
What I said was, yesterday some Congress person had said that we did it at behest of BJP & in that context I said "It is most unfortunate that some colleagues (outside CWC) have accused us of collusion with BJP, and if those people can prove this allegation, I will resign".
— Ghulam Nabi Azad (@ghulamnazad) August 24, 2020
‘राहुल गांधी तसं बोललेचं नाहीत’
भाजपाशी संबंधित वक्तव्य राहुल गांधींनी केल्याचं समजल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल हे देखील नाराज झाले होते. त्यांनी तातडीनं ट्विट करत आपली नाराजी जाहीर केली होती.
— TimePass (@TimePassTalks) August 24, 2020
सिब्बल यांनी काढून टाकलं नाराजी व्यक्त केलेलं ट्विट
काही वेळानंतर सिब्बल यांनी आपलं ट्विट काढून टाकलं आहे. राहुल गांधींनी आपल्याला फोन केला आणि असं वक्तव्य केलेलं नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. म्हणूनच मी केलेलं ट्विट माझ्या हँडलवरून काढून टाकलं आहे असं कपिल सिब्बल यांनी ट्विट करत स्पष्ट केलं आहे.
Was informed by Rahul Gandhi personally that he never said what was attributed to him .
I therefore withdraw my tweet .
— Kapil Sibal (@KapilSibal) August 24, 2020