मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्राथमिक शाळांना विद्यार्थी मिळत नसल्याचे कारण पुढे करून या जिल्ह्यातील शाळा बंद करण्याचा घाट राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने घातला आहे. यावरून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते तथा माजी खासदार निलेश राणे यांनी सरकारवर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.पुढे बोलताना ते म्हणाले कि,रत्नागिरी-सिंधुदुर्ग
जिल्ह्यातील ६०० पेक्षा अधिक प्राथमिक शाळा बंद करण्याचा निर्णय राज्याच्या शिक्षण विभागाने आहे. यामुळे ग्रामीण भागातील हजारो मुले प्राथमिक शिक्षणाला मुकणार असून ग्रामीण भागातील मुलं शिक्षणापासून वंचित राहावी हा सरकारचा उद्देश आहे का ? असा प्रश्न निलेश राणे यांनी उपस्थित केला आहे.
याबाबत निलेश राणे यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करताना ग्रामीण भागातील मुलं शिक्षणापासून वंचित राहावी हा या मागचा उद्देश आहे का ? असा प्रश्न उपस्थित केला आहे. प्रगत देशात शिक्षणावर आपल्या जास्त खर्च करतात आणि इकडे शाळा बंद होतात, अशा शब्दात आपली नाराजी व्यक्त केली आहे.
ग्रामीण भागातील मुलं शिक्षणापासून वंचित रहावी हा ह्या मागचा उद्देश आहे का??? प्रगत देशात शिक्षणावर जास्त खर्च करतात आणि इकडे शाळा बंद होतात. pic.twitter.com/IwlRzaOmKH
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) June 18, 2019