अमरावती : बहुजननामा ऑनलाईन – संजय राठोड (Sanjay Rathod) हा वाद आता संपुष्टात आणूया, असे मोठे वक्तव्य भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी केले आहे. चित्रा वाघ (Chitra Wagh) या अमरावती जिल्हा दौऱ्यावर आहेत. यावेळी त्या माध्यामांसोबत बोलत होत्या.
यावेळी पत्रकारांनी त्यांना विविध प्रश्न विचारुन कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी देखील पत्रकारांना उत्तरे दिली आहेत. संजय राठोड प्रकरणात चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकारच्या (Maha Vikas Aghadi Government) काळात मोठा आवाज उठविला होता. यावेळी संजय राठोड (Sanjay Rathod) महाविकास आघाडीत मंत्री होते. त्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी चित्रा वाघ यांनी केली होती. यावेळी चित्रा वाघ म्हणाल्या, संजय राठोड मंत्री असल्याने मला काही फरक पडत नाही. माझी भूमिका त्यावेळी देखील तीच होती आणि आता पण तीच आहे. माझी भूमिका मी बदललेली नाही. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी त्यांच्या काळात काहीही निर्णय घेतला नाही. मी वर्षभर त्याच्याविरोधात लढा दिला आहे. महाराष्ट्रात एक मुलगी मरते आणि तिची तक्रार घेतली जात नाही. त्याच्याविरोधात माझा लढा होता. मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना प्रश्न विचारत होते. आणि आता देखील मी तेच करणार आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पूजा चव्हाण (Pooja Chavan) या तरुणीच्या आत्महत्येसाठी यवतमाळचे आमदार संजय राठोड दोषी असल्याचा आरोप भाजप आणि चित्रा वाघ यांनी केला होता. मात्र आता शिंदे आणि भाजपचे सरकार आल्यावर चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी भूमिका बदलल्याचा आरोप होतो आहे. त्यावर त्या बोलत होत्या. वाघ म्हणाल्या, संजय राठोड प्रकरण आता संपवुया. त्याशिवाय महाराष्ट्रात खूप विषय आहेत. संजय राठोड यांच्या विरोधात माझा लढा सुरू राहील. न्यायालयात मी लढा देत राहीन. संजय राठोड यांना महाविकास आघाडी सरकारने (Maha Vikas Aghadi Government) क्लीन चीट दिली होती. त्यामुळे काही प्रश्न असल्यास ते तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) व तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Valse Patil) यांना विचारा.
Web Title :- Chitra Wagh | Let’s close the curtain on Sanjay Rathod case now
हे देखील वाचा :