मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – शरद पवार यांनी यापूर्वीही अशा स्थितीतून पक्षाला पुन्हा उभारी दिली आहे. यातुनही पक्ष उभा राहील असा विश्वास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून नेते बाहेर पडून भाजप-शिवसेनेत जात आहेत. त्यावर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.
आता राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून नेते बाहेर पडल्याने नुकसान तर निश्चित आहे. नुकसान झाले नाही असे म्हणण्यात काही अर्थ नाही. नुकसान झालेलेच आहे. शिवेंद्रराजे काय आणि पिचड साहेबांचा मुलगा काय? पक्षाचे नुकसान होणारच. असे ते म्हणाले.
सोडून चाललेली माणसं वसंतदादांपासून कॉंग्रेसचे काम करत होती. विजयसिंह मोहिते, पिचडसाहेब काही जण वसंतदादांची खास माणसं होती. सामाजिकदृष्ट्या या माणसांचा निश्चितपणे अनेक ठिकाणी प्रभाव आहे. सामान्य कार्यकर्ता पक्ष सोडून गेला तरी पक्षाचे नुकसान होते. ही तर नेते मंडळी आणि आमदार आहे. असेही ते म्हणाले.