चंद्रपूर : बहुजननामा ऑनलाईन – चर्मकार समाजाने केंद्र व राज्य सरकारच्या विविध प्रकारच्या शासकीय योजनांचा लाभ घ्यावा व आपली प्रगती करावी, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी येथे आयोजित संत रविदास महाराज जयंती उत्सव कार्यक्रमात केले.
साई मंदिर प्रांगणात आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन जि.प. अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या हस्ते पार पडले. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संजय धोटे, खुशाल बोंडे, राष्ट्रीय चर्मकार संघाचे जिल्हाध्यक्ष हरिभाऊ घोरे, यवतमाळ जिल्हा संघटक संभा वाघमारे, नगरसेवक सतीश उपलेंचवार, संदीप शेरकी, राजू घरोटे, पुरुषोत्तम भोंगळे, अरुण मडावी, कवडू जरिले, महादेव एकरे, रामसेवक मोरे, हितेश चव्हाण, न.प. सभापती हरिभाऊ मोरे, रवी शेंडे, महेश लिपटे, लीलाधर कानोडे, प्रा.डॉ. हेमचंद्र दुधगवळी, प्रा. धर्मराज काळे, प्रणय बच्चाशंकर, दशरथ डांगे, सदाफळे, कवडू टिकले, प्रदीप खोब्रागडे, सतीश लांडे आदींची उपस्थिती होती. आमदार संजय धोटे यांनी, चर्मकार समाजाने संघटित होऊन समस्या सोडवाव्यात, असे सांगितले. देवराव भोंगळे यांनी, चर्मकार समाजाने आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून प्रगती करण्याचे आवाहन केले.
प्रास्ताविक भाषण बाबाजी आपटे यांनी केले. संचालन पुरुषोत्तम निब्रड यांनी तर आभार गंगाधर खंडाळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महेश दुबे, विष्णू काकडे, समाधान पवार, विनोद खंडाळे, वसंत कोल्हे, प्रकाश काहिस्कर, दिलीप दुबे, महेंद्र गुलबे, विकी घोरे, संजय भटवलकर, प्रफुल्ल नवले, अरुण अहिरवार, अरुण लांडे, सुरज आदोडे, प्रवीण लांडे आदींनी सहकार्य केले. कार्यक्रमाला चर्मकार समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.