बहुजननामा ऑनलाईन – सध्या देशात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने फैलावत आहे. दरम्यान, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने अर्थात सीबीएसईने बोर्ड परीक्षेसंदर्भात एक मोठी घोषणा केली आहे. ज्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे, अशा विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचे काम सीबीएसईने केले आहे. सीबीएसईने असे म्हटले आहे की, ज्या विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी किंवा तपासणी पॉझिटिव्ह आली आहे, त्यांना आता काळजी करण्याची गरज नाही. अशा विद्यार्थ्यांना चाचणी अहवाल दर्शवावा लागेल, तरच त्यानंतर त्यांना दिलासा दिला जाणार आहे. त्यामुळे आता सीबीएसईच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेबाबतची चिंता सोडावी, असेच समजत आहे.
सीबीएसईने एक निवेदन जारी केले आहे की, ज्या विद्यार्थ्यांनी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असेल तर त्यांना परीक्षेची चिंता करण्याची गरज नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी परीक्षा पुढे ढकलली जाईल किंवा एप्रिलमध्ये परीक्षा घेतली जाईल. अन्यथा, लेखी परीक्षेनंतर अशा विद्यार्थ्यांसाठी प्रॅक्टिकल परीक्षा आयोजित केली जाईल.
सीबीएसईने कोरोना पॉझिटिव्ह विद्यार्थ्यांना घरी विश्रांती घेण्याचा आणि स्वत: ला अलिप्त करून राहण्याचा सल्ला दिलाय. सीबीएसईच्या या घोषणेनंतर विद्यार्थ्यांसह पालकांनाही दिलासा मिळालाय. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई दहावी आणि बारावीच्या परीक्षा 4 मे 2021 पासून सुरू होणार आहेत.
परीक्षेपूर्वी बराच वेळ डेटशीट आल्यामुळे विद्यार्थ्यांना तयारीची चांगली संधी मिळालीय. यापूर्वीची परिस्थिती पाहता सीबीएसई बोर्डाने दहावी आणि बारावीच्या उमेदवारांना उत्तम सुविधा दिलीय. त्यानुसार उमेदवार परीक्षा केंद्र बदलू शकतात, असा पर्याय बोर्डाने दिलाय.
जाणून घ्या, सीबीईएसई बोर्ड परीक्षेचे केंद्र कसे बदलावे?
उमेदवार कोरोना संक्रमित असल्यास किंवा कोरोनामुळे त्यांच्या शहरात नसल्यास प्रायोगिक आणि सैद्धांतिक परीक्षेचे केंद्र बदलले जाऊ शकते.अर्ज ऑनलाईनरित्या स्वीकारला जाईल. आपणास आपल्या शहरातील केंद्र बदलू इच्छित असल्यास ते अर्ज करू शकतात, परंतु अंतिम निर्णय सीबीएसई बोर्ड घेईल. उमेदवारांना दोन्ही सैद्धांतिक आणि व्यावहारिक परीक्षांची केंद्रे बदलण्याची इच्छा असल्यास परीक्षा केंद्र वेगवेगळ्या शाळांमध्ये दिले जाईल. परीक्षा केंद्र बदलणार्या उमेदवारांचे गुण अपलोड करतांना शाळेला बदली /ट्रान्स्फर लिहावे. सीबीएसईने सर्व संबंधित शाळांना 1 मार्च ते 11 जून 2021 दरम्यान व्यावहारिक परीक्षा, दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांचे अंतर्गत मूल्यांकन करण्यास सांगितलं आहे.