बहुजननामा ऑनलाइन टीम – जवळपास सहा महिन्यांपूर्वी आसामच्या सिलचरमधील डिटेंशन कॅम्पमध्ये राहणाऱ्या 104 वर्षीय चंद्रहार दास यांनी मोबाइल फोनवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सुधारित नागरिकत्व कायद्यासंबंधी (CAA) भाषण ऐकले होते. ज्यामध्ये मोदीनी कोणाचेही नागरिकत्व जाणार नाही, (CAA’s dream)तसेच कोणालाही देशाबाहेर जावे लागणार नाही असे आश्वासन दिले होते. तेंव्हा दास यांनी आपली मुलगी नियुती दासला म्हटले होते की मोदी आमार भोगोवन (मोदी माझा देव आहे, ते सर्व काही ठीक करतील. नागरिकत्व कायद्यामुळे आपण सगळे भारतीय होणार असे त्यांचे स्वप्न होते. मात्र त्यांचे ते स्वप्न अधुरेच राहिले रविवारी ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला.
2 वर्षांपूर्वी जेव्हा चंद्रहार यांचे नाव राष्ट्रीय नागरिक नोंदणीमध्ये (एनआरसी) आले नव्हते. तेंव्हा त्यांना परदेशी नागरिक म्हणत डिटेंशन सेंटरमध्ये पाठवले होते. दास जवळपास तीन महिने तिथे होते. यानंतर त्यांची सुटका करत महत्वाची कागदपत्रे जमा करण्यास सांगण्यात आले. ज्यामुळे त्यांचं नागरिकत्व सिद्ध होईल. दास यांचे सिलचरपासून 30 किमी दूर हिंदू बंगाली बहूल बराक खोऱ्यातील घऱात रविवारी निधन झाले आहे. त्यांची मुलगी नियुती दासने इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना म्हटले आहे की, जेंव्हा कधी ते आशा व्यक्त करायचे तेव्हा आपल्याला दुख: व्हायचे. घरात, गल्लीत आणि रस्त्यावर . जिथे कुठे ते पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पोस्टर दिसतील मी हात जोडते, कारण माझे वडील त्यांना देव मानायचे. देव जो सर्व काही ठीक करतो. नागरिकत्व कायदा येऊन एक वर्ष झाले आहे, पण देवाने काय केल आहे?
नव्या नागरिकत्व कायद्याला 11 डिसेंबर रोजी संसदेत मंजूर झाला.10 जानेवारी 2020 रोजी कायद्याची अमलबजावणी केली जाणार असल्याचे सांगितले गेले होते. पण अद्यापही झालेले नाही. माझ्या वडिलांची भारतीय म्हणून मृत्यू व्हावा अशी इच्छा होती. मृत्यूआधी परदेशी नागरिक असल्याचा ठपका हटवण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न केले. आम्ही न्यायालयातही गेलो, सामाजिक कार्यकर्त्यांना भेटलो, सर्व कागदपत्रे जमा केली होती. पण काहीच झालं नाही, आम्ही अद्यापही कायद्याच्या नजरेत परदेशी नागरिक आहोत. सुधारित नागरिकत्व कायद्याने आमच्यासाठी काही केले नाही. हा कायदा आमच्यासाठी काहीच फायद्याचा नसल्याचे नियुती दास हतबल होऊन सांगत होत्या.
डिटेंशन कॅम्पबद्दल बोलताना चंद्रहार यांचा मुलगा गौरंगो म्हणतो की, मार्च 2018 मध्ये काही अधिकारी घरी आले होते. त्यांनी बराच वेळ माझ्या वडिलांसोबत चर्चा केली. यानंतर त्यांना सिलचर जिल्हा जेलमध्ये परदेशा नागरिकांसोबत डिटेंशन कॅम्पमध्ये टाकण्यात आले. आम्हाला अनेक नोटीसा आल्या होत्या. पण त्यावर सुनावणी झाली नाही. माझे वडील वयस्कर आणि आजारी होते, पण तरीही डिटेंशन कॅम्पमध्ये त्यांनी वाईट अवस्थेत ठेवण्यात आले. दुसरीकडे दास कुटुंबाचं प्रकरण अद्यापही न्यायालयप्रविष्ट आहे. दास यांच्या मुले अजूनही नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी लढा देत आहेत.