नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हिंदू धर्मात वैशाख पौर्णिमेचे विशेष महत्व सांगण्यात आले आहे. वैशाख महिन्यात पौर्णिमेच्या दिवशी भगवान बुद्धांचा जन्म झाला होता. यासाठी या पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा म्हटले जाते. यावर्षी बुद्ध पौर्णिमेचा सण 26 मे बुधवारी साजरा केला जाईल. बुद्ध पौर्णिमेचा सण बौद्ध अनुयायांसह हिंदुंसाठी सुद्धा खास महत्वाचा आहे. भगवान बुद्धांना उत्तर भारतात भगवान श्री विष्णुंचा 9वा अवतार मानले जाते.
बुद्धत्वाची प्राप्ती कशी झाली?
भगवान बुद्ध 29 वर्षाच्या वयात घर सोडून सन्याशी जीवन जगू लागले होते. त्यांनी एका पिंपळाच्या झाडाखाली सुमारे 6 वर्षापर्यंत कठीण तपस्या केली. वैशाख पौर्णिमेच्या दिवशीच भगवान बुद्ध यांना पिंपळाच्या झाडाखाली सत्याची ज्ञानप्राप्ती झाली होती. भगवान बुद्धांना जिथे ज्ञानाची प्राप्ती झाली ती जागा नंतर बोधगया म्हणून ओळखली जाऊ लागली.
यानंतर भगवान बुद्ध यांनी आपल्या ज्ञानाचा प्रकाश संपूर्ण जगात पसरवला आणि नवीन प्रकाश निर्माण केला. भगवान बुद्ध यांचे महापरिनिर्वाण वैशाख पौर्णिमेच्याच दिवशी कुशीनगरमध्ये 80 वर्षाच्या वयात झाले होते. भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म, सत्याचे ज्ञान आणि महापरिनिर्वाण एकाच दिवशी म्हणजे वैशाख पौर्णिमेच्या दिवशी झाले. या कारणामुळे वैशाख महिन्यात पौर्णिमेच्या दिवशी बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाते.
कुठे-कुठे साजरी केली जाते बुद्ध जयंती :
भारतासह चीन, नेपाळ, सिंगापुर, व्हिएतनाम, थायलँड, जपान, कंबोडिया, मलेशिया, श्रीलंका, म्यानमार, इंडोनेशिया इत्यादीसह जगातील अनेक देशांमध्ये पौर्णिमेच्या दिवशी बुद्ध जयंती साजरी केली जाते. बिहारमधील बौद्धगया बुद्धांच्या अनुयायांसह हिंदूंसाठी सुद्धा पवित्र स्थळ मानले जाते. कुशीनगरमध्ये बुद्ध पौर्णिमेच्या निमित्त जवळपास एक महिन्यापर्यंत मेळावा भरतो. श्रीलंका सारख्या काही देशांमध्ये या उत्सवाला वैशाख उत्सव म्हणून साजरा केला जातो. बौद्ध अनुयायी या दिवशी आपल्या घरात दिप प्रज्वलन करतात आणि घराला सजवतात. या दिवशी बौद्ध धर्माच्या ग्रंथाचे पठन केले जाते.
मानसिक रोगांपासून मिळते मुक्ती :
भगवान बुद्धांना उत्तर भारतात भगवान श्री विष्णुंचा 9वा आवतार मानले जाते. मात्र दक्षिण भारतात बुद्धांना विष्णुचा आवतार मानले जात नाही. दक्षिण भारतीय बलरामाला विष्णुचा 8वा आवतार तर श्री कृष्णाला 9वा आवतार मानतात. बौद्ध धर्माचे अनुयायी सुद्धा बुद्धांना भगवान विष्णुचा आवतार मानत नाहीत. अशी मान्यता आहे की, बुद्ध पौर्णिमेला वातावरणात विशेष उर्जा निर्माण होते. या दिवशी चंद्र पौर्णिमा पृथ्वी आणि जलतत्वाला पूर्णपणे प्रभावित करते. ज्योतिष शास्त्रानुसार चंद्र पौर्णिमा तिथीचा स्वामी मानला जातो. यासाठी बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी सर्व प्रकारच्या मानसिक समस्यांमधून मुक्ती मिळू शकते.
शुभ मुहूर्त :
* बुद्ध पौर्णिमा 26 मे 2021, बुधवार
* पौर्णिमा तिथी प्रारंभ – 25 मे 2021 रात्री 8 वाजून 29 मिनिटांपासून
* पौर्णिमा तिथी समारोप – 26 मे 2021 सायंकाळी 4 वाजून 43 मिनिटांनी