दिल्ली : वृत्तसंस्था – मोदी सरकारच्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला जात आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारने शेतकऱ्यांना मोठी भेट दिली असून अल्प भूधारक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सहा हजार रुपये थेट जमा केले जातील, अशी घोषणा अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी केली आहे. १२ कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
अरुण जेटलींच्या अनुपस्थितीत पीयूष गोयल अर्थमंत्री म्हणून बजेट सादर करत आहेत. राष्ट्रपतींनी अर्थसंकल्पाला मंजुरी दिल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीतही अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली. आगामी निवडणुका तोंडावर असताना हे अर्थसंकल्पीय बजेट खूप महत्वाचे ठरते आहे. लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून संपूर्ण वर्षाचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवत सरकारकडून अनेक नव्या योजना जाहीर केल्या जात आहेत. स्वातंत्र्योत्तर काळात आतापर्यंत एकूण १२ वेळा अंतरिम अर्थसंकल्प सादर झालेले आहेत. यातील कोणत्याही अंतरिम अर्थसंकल्पात फार मोठ्या घोषणा झालेल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर २०१९चा अर्थसंकल्प सादर होत आहे.
यावर्षीचे अर्थसंकलप सादर करताना अर्थमंत्री पियुष गोयल यांनी सर्वात प्रथम २०१४ पासून सुरु करण्यात आलेल्या घोषणांचा आणि योजनांचा पाठपुरावा केला. अरुण जेटलींना सुदृढ आरोग्यासाठी शुभेच्छा देत अर्थसंकल्पाला सुरुवात केली . हे बजेट देशाला वैभवाकडे नेणारं आहे, ‘कमरतोड’ महागाईची कंबर तोडली, असं म्हणत पियुष गोयल यांनी बजेट सादर करण्यास सुरुवात केली. मोदींनी जोरदार बाकं वाजवून गोयल यांना समर्थन दिलं
शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार मिळणार
पीयूष गोयल यांनी शुक्रवारी लोकसभेत हंगामी अर्थसंकल्प सादर केला. शेतकऱ्यांसाठी मध्य भारतातील विधानभा निवडणुकांतील पराभवाचे प्रमुख कारण ठरलेल्या शेतकरी असंतोषावर उपाय म्हणून केंद्र सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा केली. अल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये जमा होणार आहे. २ हेक्टर जागा असलेल्या शेतकऱ्यांना तीन टप्प्यात हे पैसे दिले जातील. या योजनेसाठी केंद्र सरकारने वर्षाला ७५ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे.शेतकऱ्यांच्या हितासाठी २२ पिकांचे हमीभाव दीड पटांनी वाढवण्याचा ऐतिहासिक निर्णय केंद्र सरकारने घेतल्याचे त्यांनी सांगितले.
पशुपालन आणि मस्यपालन
शेतीबरोबरच ,शेतीपूरक जोडधंदे यांच्यावर देखेल पियुष गोयल यांनी दृष्टीक्षेप टाकला. पशुपालन , मत्सपालन कर्जांना दोन टक्यांची सूट, शेतक-यांना 500 रूपये कामधेनु अंतर्गत मिळणार, नैसर्गिक आपत्ती पिकाचं नुकसान झालेल्या कर्जात पाच टक्क्याची सूट . मिळणार अशी घोषणा अर्थमंत्री पियुष गोयल यांनी केली.