मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्यातील विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपची युती झाली होती आता विधान विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवेसनेची युती अभेद्य राहणार आहे असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. याशिवाय त्यांनी असे वक्तव्य केले की, बहुमताचे विक्रम तोडून युती सत्तेत येईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी आमदारांच्या मुंबईतील प्रवेश सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, येत्या १५ दिवसांच्या काळात जागावाटपाबाबत निर्णय घेतला जाईल. त्याचबरोबर यावेळी युती सर्वात जास्त जागा जिंकून सत्तेवर येणार असून विरोधकांना भुईसपाट करण्यासाठी आम्ही सज्ज असल्याचे देखील त्यांनी सांगितले. याशिवाय अधिक बोलतांना फडणवीस म्हणाले की, भाजप आणि शिवसेनेच्या युतीबाबत संशय निर्माण करणाऱ्या चर्चा चुकीच्या असून ही युती अभेद्य आहे.
मुख्यमंत्री म्हणाले की, भाजपच्या जागा शिवसेनेला द्याव्या लागणार आहेत, तर काही शिवसेनेच्या जागा भाजपकडे येऊ शकतात, त्याचबरोबर उद्यापासून राज्यात महाजनादेश यात्रा सुरू होत असून याद्वारे आपण मतदारांना आमच्या पाठीमागे आणण्याचे काम करणार असून राज्यातील जनता युतीच्या पाठीमागे आहे. शरद पवार यांनी आरोप केला होता की, ते धमक्या देऊन आमदार पळवताय या प्रकरणावर फडणवीस म्हणाले की, भारतीय जनता पक्ष ही धर्मशाळा नसून कुणालाही भाजपात प्रवेश दिला जात नसून आम्हाला कोणत्याही आमदाराला धमकावण्याची काहीही गरज नाही. आमदार स्वतःहून आमच्या पक्षात येण्यासाठी उत्सुक आहेत. मात्र चांगले काम करणाऱ्या आमदारांना आम्ही प्रवेश देत असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.