कोल्हापूर : बहुजननामा ऑनलाईन – महाराष्ट्र आणि झारखंडमधील सत्ता हातातून गेल्याने भाजपला धक्का बसला आहे. त्यातच नाशिक आणि आता कोल्हापूर मधील जिल्हा परिषदेची जागा भाजपच्या हातातून गेली आहे. तिथे आता महाविकास आघाडीची सत्ता आली आहे. भाजपचे चंद्रकांत पाटील यांना सर्वात मोठा धक्का बसल्याचे मानले जात असून पश्चिम महाराष्ट्र मधील ही सर्वात मोठी राजकीय घडामोड मानली जात आहे. काँग्रेस आणि शिवसेनेने आपले सदस्य सहलीवर नेले असताना भाजप आणि महाडिक गटाचे सदस्यही सहलीवर होते.
कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये दाखल झाल्यानंतर निवडीमध्ये अपेक्षेनुसार महाविकास आघाडीतील काँग्रेसचे बजरंग पाटील यांची अध्यक्षपदी आणि राष्ट्रवादीचे सतीश पाटील यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. नाशिक जिल्हा परिषदेत अध्यक्षपदी शिवसेनेचे बाळासाहेब क्षीरसागर यांची तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे सयाजी गायकवाड यांची निवड झाली आहे.
नाशिकमध्ये महाविकास आघाडीला यश मिळाले असून शिवसेनेच्या उमेदवाराला राष्ट्रवादी व काँग्रेसने पाठिंबा दिल्यामुळे अध्यक्षपदं जास्त मिळाली आहेत. भाजपने या निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे शिवसेनेचे उमेदवार बाळासाहेब यांना अध्यक्षपद मिळण्याचा मार्ग मिळाला. ‘कोल्हापूर जिल्हा परिषदेमधील भाजपाची सत्ता जाणार आहे. काही वेळेपूर्वीच कोल्हापूर जिल्हा परिषदेची सभा सुरु झाली आहे. अध्यक्षपदी महाआघाडीला यश मिळणार आहे,’ असा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात आला आहे.
Visit : bahujannama.com