मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – बनावट टीआरपी (TRP) रेटिंगद्वारे कोट्यावधीच्या जाहिराती मिळवून नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. रिपब्लिक चॅनेलच्या सीईओला अटक करण्यात आली असून या प्रकरणात आतापर्यंत 13 लोकांना अटक करण्यात आली आहे. रिपब्लिक (Republic) चॅनेलचे सीईओ (CEO) विकास खानचंदानी (Vikas Khanchandani) यांनी अटक करण्यात आली आहे. यावरुन भाजप नेते अतुल भातखळकर (Atul bhatkhalkar) यांनी ठाकरे सरकारवर (Thackeray Government) जोरदार हल्लाबोल केला आहे.
‘ही तर उद्धव बाळासाहेब ठाकरे सरकारची हुकूमशाही’ असं म्हणत भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांवर नशाणा साधला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन त्यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे. कोणत्याही कागदपत्रांशिवाय रिपब्लिक मीडिया नेटवर्कचे सीईओ यांच्या घरी मुंबई पोलीस दाखल झाले आणि त्यांना अटक केली. महाराष्ट्रात लोकशाही पूर्णपणे संपुष्टात आली आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) सरकारची हुकूमशाही सुरु आहे, असे भातखळकर यांनी म्हटलं आहे.
रिपब्लिकचे CEO विकास खानचंदानी यांना अटक
गेले काही दिवस गाजत असलेल्या टीआरपी घोटाळ्यात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने रिपब्लिक टीव्हीचे सीईओ विकास खानचंदानी यांना अटक केली आहे. गुन्हे शाखेने रिपब्लिक नेटवर्कच्या चौघांना गुरुवारी नव्याने समन्स बजावले होते. काल रात्री रिपब्लिकचे सीईओ विकास खानचंदानी हे चौकशीसाठी गुन्हे शाखेच्या कार्यालयात दाखल झाले होते. त्यांच्याकडे अनेक तास चौकशी केल्यानंतर त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. या टीआरपी घोटाळ्यात मुंबई पोलिसांनी आतापर्यंत 13 जणांना अटक केली आहे.
बिना कागजात रिपब्लिक मीडिया नेटवर्क के सीईओ के घर पहुंची मुंबई पुलिस, किया गिरफ्तार…
महाराष्ट्र में लोकतंत्र पूरी तरह से समाप्त हो चुका है और उद्धव बालासाहेब ठाकरे सरकार की तानाशाही चल रही है… https://t.co/so9OhsahFT— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) December 13, 2020