मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – बिग बॉस 14 (Bigg Boss Season 14) मध्ये 6 नवीन चॅलेंजर्सची एन्ट्री झाली आहे. रविवारी शोचा होस्ट सलमान खान (Salman Khan) यानं या 6 चॅलेंजर्सला इंट्रोड्युस केलं आहे. यात राखी सावंत, विकास गुप्ता, राहुल महाजन, कश्मिरा शाह, अर्शी खान आणि मनू पंजाबी यांचा समावेश आहे. घरात जाण्याआधी राखी सावंत (Rakhi Sawant) हिनं सांगितलं की, गेल्या काही काळापासून ती आर्थिक अडचणींचा सामना करत आहे. तिला तिचे दागिने आणि प्रॉपर्टी विकावी लागली होती. शोमध्ये जाण्याच्या आधी तिनं एका वृत्तपत्राला मुलाखत दिली. त्यावेळी बोलताना राखीनं अनेक खुलासे केले आहेत.
https://www.instagram.com/p/CAnsb5mgvgJ/
धोका आणि फ्रॉडचाही सामना केला
मुलाखतीत बोलताना राखी म्हणाली, गेल्या 3-4 वर्षांत तिच्या आयुष्यात खूप चढउतार आले. याव्यतिरिक्त तिला धोका आणि फ्रॉडचाही सामना करावा लागला. त्यामुळं ती कामावरही फोकस करू शकली नव्हती.
https://www.instagram.com/p/CAnrD0yArhy/
सांगणार सुशांतशी संबंधित रहस्य
राखीनं सांगितलं, ती या शोमध्ये सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूशी संदर्भात रहस्यांचीही पोलखोल करणार आहे. सध्या याबाबत जास्त काही सांगू शकत नाही, असंही ती म्हणाली होती.