बहुजननामा ऑनलाइन टीम – देशातील कोरोनाच्या ( Corona) पार्श्वभूमीवर शाळा ( School) मागील ८ महिन्यांपासून बंद आहेत. मात्र आता कोरोनाचे संकट हळूहळू कमी झाल्याने बर्याच राज्यांनी शाळा, महाविद्यालये सुरू करण्यास सुरुवात केली आहे. काही राज्यांनी शाळा सुरूही केल्या आहेत. तर महाराष्ट्र राज्यानं 23 नोव्हेंबरपासून शाळा सुरू करणार असल्याचे सांगितले आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड ( Education Minister Varsha Gaikwad) यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.पण याआधी दिल्लीच्या एम्स रुग्णालयातील ( AIIMS report ) कोरोना संदर्भातील रिपोर्टनं पालकांची चिंता वाढवली आहेत.
एम्सने प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टनुसार, सर्व पॉझिटिव्ह रूग्णांपैकी 40% रुग्णांमध्ये लक्षणं दिसत नाहीत. यातील 73.5% रुग्ण 12 वर्षाखालील आहे. या मुलांना कोरोना होतो पण त्याच्यात लक्षणे दिसून येत नाही त्यामुळे या वयाची मुले पॉझिटिव्ह आहेत कि नाही कुणाला समजून देखील येत नाही. तर देशभरात १० राज्यांमध्ये शाळा सुरु झाल्या असून उत्तर प्रदेश, बिहार, आंध्र प्रदेश यासारख्या मोठ्या लोकसंख्या असलेल्या राज्यांचा समावेश आहे. एम्सच्या अहवालानुसार, कोरोना संक्रमित 4 पैकी 3 मुलांमध्ये अशी कोणतीही लक्षणे दिसत नाहीत जी इतर मुलांसाठी अतिशय धोकादायक असतात. त्यामुळे अनेक मुलांना संक्रमण होण्याचा
महाराष्ट्रात ( Maharashtra) 23 नोव्हेंबरपासून शाळा सुरू
एसओपी मंजूर झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात 23 नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. त्याचबरोबर दहावी आणि बारावीच्या परीक्षा देखील मे महिन्यात होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी राज्यातील शाळा आणि महाविद्यालयं बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे पालकांचा विचार घेऊन हा निर्णय घेणार असल्याचेत्यांनी सांगितले.
आंध्र प्रदेशात 575 विद्यार्थी, 829 शिक्षक पॉझिटिव्ह
आंध्र प्रदेशात नववी आणि दहावीचे वर्ग २ नोव्हेंबरपासून खुले करण्यात आले. त्यानंतर तीन दिवसांतच 575 विद्यार्थी, 829 शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात देखील हीच अवस्था होणार नाही ना याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.