नागपूर बहुजननामा ऑनलाईन – नागपूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेकडून दोन ते तीन महिन्यांपुर्वीच एक ते दीड कोटी रुपये खर्चून जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत बांधलेला बंधारा पावसाच्या एकाच पाण्यात वाहून गेला आहे. पावसाळ्यात हा बंधारा एकाच पावसात वाहून गेल्याने अदिकाऱ्यांचे दाबे दणाणले आहेत. तर एकाच पावसात जलयुक्त शिवारच्या कामाचं खरं स्वरुप समोर आले आहे.
नागपूर जिल्ह्यातील पालासावळी कोंडासवळी या गावात या बंधाऱ्याचे काम सुरु असतानाच गावचे सरपंच रवींद्र ठाकूर व गावकऱ्यांनी कामाच्या गुणवत्तेसंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. परंतु तेव्हा केलेल्या तक्रारीनंतर आवाज दडपला गेला होता. रस्ता, कॅनल अशा अनेक ठिकाणी मुख्यमंत्र्याच्या जिल्ह्यातच असं काम होत आहे. असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. हे काम जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाने केले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे केले असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
नागपूर जिल्ह्यात सध्या मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे जलाशयांमध्ये मोठा जलसाठा झाला आहे. दोन दिवसांत पाणी वाढत गेल्याने बंधाऱ्यावर ताण आला. मातर् बंधाऱ्याचं काम निकृष्ट दर्जाचे असल्याने पाण्याचा ताण तो पेलवू शकला नाही आणि तो फुटला. तर बंधाऱ्यात पाणी जास्त नसल्याने मोठा अनर्थ टळला.